शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:01 IST

ऑपरेशन सिंदूरमधील दारुण पराभव आणि भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्र क्षमतेमुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अवघ्या जगाने भारताची ताकद पाहिली. या मोहिमेनंतर पाकिस्तानलाभारताच्या शक्तीचा अंदाज आला आणि त्यांनी आपल्या देशाची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्लामाबाद येथे आयोजित 'मार्का-ए-हक' सोहळ्या दरम्यान 'पाकिस्तान आर्मी रॉकेट फोर्स कमांड'ची घोषणा केली.

पाकिस्तानचा हा नवा लष्करी विभाग मोठ्या प्रमाणात पारंपारिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तैनात करण्यासाठी तयार केला जात आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 'फतेह' मिसाईल आणि इतर क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असेल.

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या चिंतेत पडली भर!ऑपरेशन सिंदूरमधील दारुण पराभव आणि भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्र क्षमतेमुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पाकच्या लष्करचा हा नवा विभाग विद्यमान आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या (ASFC) समांतर काम करेल. परंतु, त्यात अण्वस्त्रांऐवजी फक्त पारंपारिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट यांचा समावेश असेल.

पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीत बदल!पाकिस्तानच्या या पावलाकडे भारताच्या ब्रह्मोस, पृथ्वी आणि अग्नि मालिकेसारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र शक्तीसमोर स्वतःचे संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानने उचललेले हे पाऊल लष्करी रणनीतीतील बदल म्हणून पाहिले जात आहे.

भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर'ऑपरेशन सिंदूर'चे यश हे भारताच्या लष्करी रणनीतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामुळे पाकिस्तानला योग्य उत्तर मिळाले. भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रे आणि आधुनिक शस्त्रे वापरून शत्रूचा पराभव केला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला दाखवून दिले की, तो आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही, तर या नवीन भारताची संरक्षण क्षमता पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही, भारत आपली संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ् उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर भारताच्या शत्रूंना भारतीय सैन्याच्या ताकदीची कल्पना आली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतIndian Armyभारतीय जवान