शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सूफी दर्गा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाग, 100 दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: February 18, 2017 8:48 AM

सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. लाल शाहबाज कलंदर येथे गुरुवारी आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात १00 भाविक ठार, तर २५० हून अधिक जखमी झाले होते. लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतानाही या आठवड्यात देशात अनेक हल्ले झाले. सुफी दर्ग्यावरील हल्ला सर्वात घातक होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 'देशात सांडलेल्या रक्ताच्या थेंबा थेबाचा हिशेब घेतला जाईल. आता संयम बाळगणार नाही', असं म्हटलं होतं.
 
(पाकमध्ये ३९ दहशतवाद्यांचा खात्मा)
 
पाकिस्तान लष्कराने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरदेखील सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. लष्कराने तेथेदेखील काही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातदेखील 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पेशावरमधील रेगी परिसरात एका सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान सीमारेषेलगत असलेल्या चेकपोस्टवरही दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत चार दहशतवादी ठार करण्यात आले. 
 
13 फेब्रुवारीनंतर पाकिस्तानमध्ये एकूण आठ दहशतवादी हल्ले झाले आहेत. सोमवारी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले होते. त्याचदिवशी बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येदेखील स्फोट झाला होता. मंगळवारी क्वेटामध्ये बॉम्ब निकामी करत असताना पथकातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान नेहमी चांगलं आणि वाईट तालिबान असा फरक करत आला आहे. तसंच भारत आणि अफगाणिस्तानात होणा-या दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोप अफगाणिस्तान सुरुवातीपासून करत आला आहे. 
 
पाकिस्तान लष्कराने पाक-अफगाण सीमेजवळील शालमान भागात मोहीम सुरू केली असून, यात तोफांचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून पाक-अफगाण सीमा तोखराम येथे बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाकमध्ये एकापाठोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकापाठोपाठ कारवाई सुरू केली. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी उच्चपदस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सहमती दर्शविली होती. सुफी दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने आपल्या आमाक या वृत्तसंस्थेद्वारे स्वीकारली होती.