शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 12:50 IST

24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे.

कराची: 24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील कराची येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी टार्गेट किलिंग अंतर्गत घरात घुसून जहूर मिस्त्रीवर गोळ्या झाडल्या. जहूर मिस्त्री हा जैशचा दहशतवादी होता आणि कराचीमध्ये व्यापाऱ्याची छुपी ओळख घेऊन राहत होता.

जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळदोन्ही हल्लेखोरांचे फुटेजही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, मात्र दोघांनी मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. या हत्याकांडाने जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयही हैराण झाली आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये या हत्याकांडाचे कुठेही कव्हरेज नाही. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने या हत्याकांडाचे वृत्त दिले असले तरी झहूर मिस्त्रीचे खरे नाव समोर आले नाही.

अंत्यविधीत अनेक दहशतवादी सामीलजिओ टीव्हीने आपल्या अहवालात फक्त असे म्हटले आहे की, कराचीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. अहवालात सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले असून, हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले. जहूर मिस्त्रीच्या हत्येनंतर घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारात जैशचे अनेक बडे दहशतवादी सामील झाल्याचीही बातमी आहे.

कोण होता जुहूर मिस्त्री?जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री हा एअर इंडियाचे IC-814 अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक होता. 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी एका भारतीय विमानाचे हवेतून अपहरण केले होते. नेपाळमधील काठमांडू येथून विमानाचे अपहरण करुन ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले होते.

काय होती त्यांची मागणी?मसूद अझहर, मुश्ताक अहमद आणि अहमद उमर सईद शेख या दहशतवाद्यांच्या सुटकेच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटकेची अट ठेवण्यात आली होती. यादरम्यान, विमानातील प्रवासी आठवडाभर दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. त्या विमान अपहरणात एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. पण, सुदैवाने 170 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्या घटनेनंतर जहूर भूमिगत झाला, काही काळानंतर तो कराचीमध्ये नाव बदलून व्यवसाय करत असल्याचे समजले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीDeathमृत्यू