शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान नरमलं, आता म्हणतात चर्चेने काढू शकतो तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 09:24 IST

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे

ठळक मुद्देपाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे याआधी कधीच पाकिस्तानच्या कोणत्याही लष्कर प्रमुखाने काश्मीर मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा उल्लेख केला नव्हता'दोन्ही देशात राहणा-या लाखो लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर स्थायी शांतता गरजेची आहे', असं कमर बाजवा बोलले आहेत

इस्लामाबाद, दि. 9 - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. एकीकडे वारंवार युद्धाची धमकी देणा-या पाकिस्तानची भूमिका नरमली असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात कडक पाऊल उचलण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचा निर्धार केल्यानंतर लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचं हे वक्तव्य आलं आहे. विशेष म्हणजे याआधी कधीच पाकिस्तानच्या कोणत्याही लष्कर प्रमुखाने काश्मीर मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा उल्लेख केला नव्हता. कमर बाजवा यांनी संरक्षण दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना हे मत व्यक्त केलं आहे. 

दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद यांनी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या धरतीवर आश्रय मिळाल्याची कबुली दिली असतानाच कमर बाजवा यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. विकासासाठी शांतता गरजेची आहे यावर कमर बाजवा यांनी जोर दिला. 'दोन्ही देशात राहणा-या लाखो लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर स्थायी शांतता गरजेची आहे', असं कमर बाजवा बोलले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानवर टीका करणे आणि काश्मिरींवर लष्कराचा वचक ठेवण्यापेक्षा भारताने या मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढल्यास जास्त चांगलं होईल'.

कमर बाजवा यांनी थेट भारताचा उल्लेख न करत शेजारी देश असं म्हणत सांगितलं की, 'दक्षिण आशियात अणुबॉम्ब घेऊन आम्ही आलेलो नाही. आमचे अणुबॉम्ब शांतता प्रस्थापित करण्याची हमी देतात. हे आमच्या शेजारी राष्ट्राला उत्तर आहे, जो आमच्यापेक्षा ताकदवान आहे. हा तोच देश आहे, जो दक्षिण आशियात पारंपारिक युद्द घेऊन आला आहे'.

जनरल कमर बाजवा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'सुपर पॉवरच्या माध्यमातून सुरु केलेल्या युद्धाची किंमत आम्ही दहशतवाद, आर्थिक नुकसानाच्या माध्यमातून दिली आहे. आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत, आणि आमच्या देशातील जमिनीचा वापर दुस-या देशाविरोधात होऊ देणार नाही. दुस-या देशांकडूनही आम्ही हीच अपेक्षा ठेवतो'.

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी कठोर भूमिका घेत दोन हात करण्याची तयारी दाखवली असल्याने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नरमले असल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे कदाचित त्यांच्यात परिवर्तन होत असावं. आपल्या जमिनीवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेसोबत इतर देशांकडून पाकिस्तानला विचारणा केली जात असून, टार्गेट केलं जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आपल्या धोरणांमध्ये बदल करताना दिसत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान