शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Pakistan On Srinagar Sharjah Flight : आमच्या हवाई हद्दीचा वापर करू नका; श्रीनगर-शारजाह उड्डाणावर पाकिस्तान भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:32 IST

Pakistan Closed Air Space for India Flight : श्रीनगर ते शारजाह अशा सुरू झालेल्या विमान सेवेवरून पाकिस्तानचा रागराग.

Pakistan Closed Air Space for India Flight : अनेकदा तोंडघशी पडूनही पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून बाहेर येत नाही. श्रीनगर ते शारजाह दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विमानसेबेवरून आता पाकिस्तानला राग अनावर झाल्याचं दिसून येत आहे. पाकिस्ताननं या विमानाच्या आपल्या हवाई हद्दीतून उड्डाणास बंदी घातली आहे. त्यामुळे आता या विमानाला लांब फेरा घेऊन शारजाहला जावं लागत आहे.

काश्मीरमधून ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही काश्मीरमधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास पाकिस्ताननं बंदी घातली होती. दरम्यान, पाकिस्ताननच्या आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातल्याचा प्रकार हा दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली. "हे अतिशय दुर्देवी आहे. २००९-१० मध्ये श्रीनगर येथून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबतही पाकिस्ताननं असंच केलं होतं. मला आशा होती की गो फर्स्टच्या विमानाला देण्यात आलेली मंजुरी ही दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत होतं. परंतु असं व्हायचं नव्हतं," अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

गो फर्स्टनं सुरू केली होती सेवाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर-शारजाह विमानाला हिरवा झेंडा दाखवला होता. गो फर्स्टनं ही सेवा सुरू केली होती. श्रीनगर ते शारजाह अशी थेट आंतराष्ट्रीय उड्डाण आमइ कार्गो सेवा देणारी ही पहिली विमान कंपनी आहे. या दोन ठिकाणांदरम्यान आठवड्याला चार विमानांचं उड्डाण केलं जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी हवाई हद्दीतील उड्डाणासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असा दावा पाकिस्तानी माध्यमांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी यावरू इम्रान खान सरकारला घेरलं होतं. विमान कंपनीनं पाकिस्तानची परवानगी घेतली होती का नाही हे पाकिस्तानचं सरकारच सांगू शकेल असंही ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानSrinagarश्रीनगर