शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:13 PM

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र...

जिनिव्हा - भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काश्मिरप्रश्नावरून त्याला वारंवार नामुष्की झेलावी लागत आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून भारताविरोधात प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. जिनेव्हा येथे सुरू असलेल्या 42 व्या मानवाधिकार सेशनमध्ये पाकिस्तानला भारताविरोधात प्रस्ताव आणण्यासाठी अन्य देशांचा आवश्यक प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठा विजय आहे. दरम्यान, काश्मीरमधून कलम 370 हटवणे ही आपली अंतर्गत बाब असे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी स्पष्ट केलेले आहे.  दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर पाकिस्ताने गुरुवारी रात्री भारताविरोधात दाखल केलेल्या मानवाधिकार हननाच्या प्रस्तावाला पुरेसे समर्थन मिळू शकले नाही. अगदी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडूनही पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि काश्मीर प्रश्न हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याच्या करण्यात येत असलेल्या दाव्याचा मोठा विजय मानला जात आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये एकूण 47 देशांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेत भारतही आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे. या परिषदेत भारतीय पथकाचे नेतृत्व अजय बिसारिया करत आहेत. बिसारिया यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताविरोधात प्रस्ताव आणण्यात अपयश आल्याने काश्मीर प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ