शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
2
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
4
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
5
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
6
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
7
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
8
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
9
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
10
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
11
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
12
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
13
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
14
Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
15
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
16
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
17
कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
18
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
19
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
20
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:55 IST

भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. जर आता युद्ध घडलं तर त्यात पाकिस्तानचा मोठा विजय होईल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती. 

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत म्हटलं की, इतिहासात मागे वळून पाहिले तर भारत फक्त एक संस्थानिक राज्य म्हणून अस्तित्वात होते,  ते १८ व्या शतकात आणि औरंगजेबाच्या काळात होते. भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल असा दावा पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

भारताने पाकला शिकवला धडा

पाकिस्तान भारताविरोधात कायम षडयंत्र रचत आला आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले केले परंतु भारताने पहलगाम हल्ल्यानंतर चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमधून बदला घेतला. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारताने पाकिस्तानी सैन्य तळांवरही टार्गेट हल्ला केला. 

राजनाथ सिंह यांची धमकी

अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक भागात पाकिस्तानच्या वाढत्या सैन्य हालचाली आणि बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने या भागात कुठलेही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला. सर क्रीकमध्ये पाकिस्तान त्यांचे सैन्य वाढवत आहे. जर पाकिस्तानने काही चुकीचं पाऊल उचलले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रीकमधून जातो हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan War Looming? Pakistan Minister's Empty Threat

Web Summary : Tensions escalate after Operation Sindoor. Pakistan's minister threatens war, claiming victory. Rajnath Singh warns Pakistan against aggression in Sir Creek, promising a strong response, reminding them of Karachi's route.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर