शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:55 IST

भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. जर आता युद्ध घडलं तर त्यात पाकिस्तानचा मोठा विजय होईल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती. 

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत म्हटलं की, इतिहासात मागे वळून पाहिले तर भारत फक्त एक संस्थानिक राज्य म्हणून अस्तित्वात होते,  ते १८ व्या शतकात आणि औरंगजेबाच्या काळात होते. भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल असा दावा पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

भारताने पाकला शिकवला धडा

पाकिस्तान भारताविरोधात कायम षडयंत्र रचत आला आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले केले परंतु भारताने पहलगाम हल्ल्यानंतर चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमधून बदला घेतला. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारताने पाकिस्तानी सैन्य तळांवरही टार्गेट हल्ला केला. 

राजनाथ सिंह यांची धमकी

अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक भागात पाकिस्तानच्या वाढत्या सैन्य हालचाली आणि बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने या भागात कुठलेही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला. सर क्रीकमध्ये पाकिस्तान त्यांचे सैन्य वाढवत आहे. जर पाकिस्तानने काही चुकीचं पाऊल उचलले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रीकमधून जातो हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan War Looming? Pakistan Minister's Empty Threat

Web Summary : Tensions escalate after Operation Sindoor. Pakistan's minister threatens war, claiming victory. Rajnath Singh warns Pakistan against aggression in Sir Creek, promising a strong response, reminding them of Karachi's route.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर