शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:55 IST

भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. जर आता युद्ध घडलं तर त्यात पाकिस्तानचा मोठा विजय होईल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती. 

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत म्हटलं की, इतिहासात मागे वळून पाहिले तर भारत फक्त एक संस्थानिक राज्य म्हणून अस्तित्वात होते,  ते १८ व्या शतकात आणि औरंगजेबाच्या काळात होते. भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल असा दावा पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

भारताने पाकला शिकवला धडा

पाकिस्तान भारताविरोधात कायम षडयंत्र रचत आला आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले केले परंतु भारताने पहलगाम हल्ल्यानंतर चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमधून बदला घेतला. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारताने पाकिस्तानी सैन्य तळांवरही टार्गेट हल्ला केला. 

राजनाथ सिंह यांची धमकी

अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक भागात पाकिस्तानच्या वाढत्या सैन्य हालचाली आणि बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने या भागात कुठलेही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला. सर क्रीकमध्ये पाकिस्तान त्यांचे सैन्य वाढवत आहे. जर पाकिस्तानने काही चुकीचं पाऊल उचलले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रीकमधून जातो हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan War Looming? Pakistan Minister's Empty Threat

Web Summary : Tensions escalate after Operation Sindoor. Pakistan's minister threatens war, claiming victory. Rajnath Singh warns Pakistan against aggression in Sir Creek, promising a strong response, reminding them of Karachi's route.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर