शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:19 IST

‘ऑपरेशन सिंदूर १’ काळात भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही असं भारतीय लष्कर प्रमुखांनी म्हटलं होते.

कराची - जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असे खडे बोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले होते. त्यावर आता पाकिस्तानी सैन्यानं उत्तर दिले आहे. जर भविष्यात या दोन्ही देशात युद्ध झाले तर ते खूप विनाशकारी असेल. पाकिस्तानी सैन्य शत्रूच्या प्रत्येक भागात लढण्यास सक्षम आहे अशी पोकळ धमकी पाकिस्तानी सैन्याने दिली आहे.

पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, भारतीय संरक्षण मंत्री आणि सैन्य प्रमुखांकडून चिथावणीखोर विधाने पाहता भविष्यात कुठलाही संघर्ष झाला तर तो खूप विनाशकारी असू शकतो हा आमचा इशारा समजा. जर शत्रूत्वाचा नवा काळ सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही विना कुठलीही पर्वा न करता जोरदार प्रत्युत्तर देऊ. नवीन नियम बनवण्याचा विचार करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की पाकिस्तानने आता एक नवीन पद्धत स्वीकारली आहे, ही पद्धत जलद, निर्णायक आणि विनाशकारी असेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनावश्यक धमक्या आणि कुठल्याही हल्ल्यांना तोंड देताना पाकिस्तानचे लोक आणि सशस्त्र दल प्रत्येक शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता आणि दृढनिश्चय बाळगतात. यावेळी आम्ही भौगोलिक सीमांमागे लपून राहण्याची कल्पना मोडून काढू आणि भारतीय भूभागाच्या सर्वात दुर्गम कोपऱ्यात पोहोचू. नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकण्याबाबत बोलाल तर, जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचे दोन्ही बाजूंना परिणाम होतील हे भारताने जाणून घेतले पाहिजे असंही पाकिस्तानी सैन्याने म्हटलं आहे.

भारतीय लष्करप्रमुख काय म्हणाले होते?

ऑपरेशन सिंदूर १’ काळात भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या. सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत.जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला खडसावले होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan will vanish from map: India warns, Pakistan gives empty threat.

Web Summary : India warns Pakistan to stop harbouring terrorists. Pakistan retaliates with threats of devastating war. They claim readiness to strike deep within India, dismissing geographical boundaries. India asserts readiness, citing past operations and citizen support.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर