शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ, पाक लष्करप्रमुखांनी भारताविरोधात ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 10:16 AM

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी (6 सप्टेंबर) रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानदेखील उपस्थित होते. 

पाकिस्तानच्या सीमेवर ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडवलं आणि देशासाठी प्राण गमावले, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करणार, असे विधान यावेळेस  पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केले आहे. 

 ''6 सप्टेंबर 1965 हा दिवस पाकिस्तानासाठी महत्त्वाचा दिवस आहे. झालेल्या या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. 1965 आणि 71 च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो'', असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरात वाढलेल्या दहशतवादी कारवायांचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. हे पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद