शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:46 IST

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या निर्णयामुळे एअर इंडियाला मोठा दिलासाएअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रातील उड्डाणावर बंदी आणली होतीत्या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना 548 कोटींचा फटका बसला

नवी दिल्ली - मागील काही महिने पाकिस्तान हवाई क्षेत्रात असणारी बंदी मंगळवारी सकाळी पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करु शकणार आहेत. 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले होते. मंगळवारी पहाटे 12.41 मिनिटांनी पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविली. त्यामुळे या मार्गातून पुन्हा सामान्यरित्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एअरमेन(NOTAM) नोटीस जारी केली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राईक केला होता. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतीय विमान उड्डाणांना त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश बंद केला होता. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक भारतीय विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला होता. एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांना मिळून 548 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील फक्त 2 मार्ग खुले केले होते. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागले आहे. मात्र मंगळवारी पाकिस्तानकडून सर्व हवाई मार्ग खुले करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे संघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार होते. मात्र ऐनवेळी भारताने आशियाई हवाई मार्गातून बिश्केकचा प्रवास केला.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडियाIndiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला