शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:46 IST

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या निर्णयामुळे एअर इंडियाला मोठा दिलासाएअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रातील उड्डाणावर बंदी आणली होतीत्या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना 548 कोटींचा फटका बसला

नवी दिल्ली - मागील काही महिने पाकिस्तान हवाई क्षेत्रात असणारी बंदी मंगळवारी सकाळी पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करु शकणार आहेत. 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले होते. मंगळवारी पहाटे 12.41 मिनिटांनी पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविली. त्यामुळे या मार्गातून पुन्हा सामान्यरित्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एअरमेन(NOTAM) नोटीस जारी केली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राईक केला होता. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतीय विमान उड्डाणांना त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश बंद केला होता. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक भारतीय विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला होता. एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांना मिळून 548 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील फक्त 2 मार्ग खुले केले होते. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागले आहे. मात्र मंगळवारी पाकिस्तानकडून सर्व हवाई मार्ग खुले करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे संघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार होते. मात्र ऐनवेळी भारताने आशियाई हवाई मार्गातून बिश्केकचा प्रवास केला.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडियाIndiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला