शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:43 IST

...याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानात घबराट निर्माण झाली आहे. आतापर्यंत भारताने सिंद्धू पाणी कराराच्या स्थगितीसह पाकिस्तानविरुद्ध पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र याहूनही काही मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तान भयभीत झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने मदतीसाठी आपल्या मित्र देशांशीही संपर्क साधला होता. मात्र, त्याच्याकडूनही त्याला झटकाच बसला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व मित्र देशांशी संपर्क साधला. परंतु अद्याप कुणीही मध्यस्थीचा प्रयत्न केलेला नाही. याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

दक्षिण काश्मिरातील पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या प्रमुख पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झला तर अनेक जण जखमी जाले आहेत. यांपैकी बहुतंश पर्यटक आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अनेक मुस्लीम देशांनी निषेध केला आहे. कतार, जॉर्डन आणि इराक तसेच दिल्लीतील अरब लीग मिशननेही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, भारतासोबत एकता आणि शोककूल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. याशिवया इतरही अनेक देशांकडून एकतेचे संदेश आले आहेत.

दरम्यान, आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता शफकत अली खान म्हणाले, "सिंधू पाणी करार अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानसाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ही आमची जीवनरेखा आहे. आमचा हक्क आहे. आमच्या लोकांसाठी हा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

तत्पूर्वी, भारतानेही नवी दिल्लीतील सुमारे ४५ देशांच्या राजदूतांना पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची आणि त्याचा सीमापार दहशतवादाशी असलेला संबंध, यासंदर्भात माहिती देऊन पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तुकड्यांमध्ये राजदूतांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील राजदूत उपस्थित होते. भारताने गुरुवारी बहुतेक G20 देशांमधील वरिष्ठ राजदूतांना आणि आपल्या अनेक जवळच्या धोरणात्मक भागीदारांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत