शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

'पहलगाम हल्ला आर्थिक युद्ध; त्यांना सोडणार नाही', जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:54 IST

Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद हा जागतिक धोका आहे. यामुळे सर्व देशांचे नुकसानच होणार आहे.'

Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर क्वाड देशांच्या (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर महत्वाची टिप्पणी केली. 'पहलगाम दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील पर्यटन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने केलेलs आर्थिक युद्ध होते. आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, आम्ही पाकिस्तानच्या अणू हल्ल्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला आम्ही योग्य उत्तर देऊ.' 

जयशंकर पुढे म्हणतात, 'पहलगाम हल्ला हा आर्थिक युद्ध होते. त्याचा उद्देश अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या काश्मीरमधील पर्यटन नष्ट करणे होता. तसेच, त्याचा उद्देश धार्मिक हिंसाचार भडकवणेदेखील होता. कारण लोकांना मारण्यापूर्वी त्यांना धर्म विचारण्यात आला. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की, आम्ही दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही.' 

'भारताविरुद्ध हल्ले करणारे पाकिस्तानस्थित दहशतवादी गुप्तपणेच काम करत नाहीत, तर या दहशतवादी संघटना आहेत, ज्यांचे कॉर्पोरेट मुख्यालय पाकिस्तानच्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि निधी देणाऱ्या सरकारलाही आम्ही सोडणार नाही. भारताचा असा विश्वास आहे की दहशतवाद हा खरोखरच सर्वांसाठी धोका आहे. कोणत्याही देशाने त्यांचे धोरणे राबवण्यासाठी दहशतवादाचा वापर करू नये. शेवटी हा सर्वांनाच नुकसान पोहोचवतो,' असेही त्यांनी यावेळी म्हटले.

युद्धविरामात अमेरिकेची भूमिका होती का?जयशंकर यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षा थांबवण्यासाठी मध्यस्थी केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'नाही, मला तसे वाटत नाही. ९ मे रोजी रात्री उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आणि आपण काही गोष्टी स्वीकारल्या नाहीत, तर पाकिस्तान भारतावर खूप मोठे हल्ले करू शकतो, असे त्यांनी सांगितले.'

'मी तेव्हा तिथेच होतो. पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही पाकिस्तानच्या धमक्यांकडे लक्ष दिले नाही. त्यांनी संकेत दिला की, आमच्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. हे काल रात्री घडले आणि त्या रात्री पाकिस्तानी लोकांनी आमच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला, त्यानंतर आम्ही खूप लवकर प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, पाकिस्तानी चर्चेसाठी तयार आहेत,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरS. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प