शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:32 IST

जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.  

सुरेश एस. डुग्गर 

जम्मू - भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. तेथील अनेक चौक्यांवर असलेल्या पाकिस्तानच्या असलेल्या सैनिकांपेक्षा तिप्पट-चौपट संख्येने त्या देशाचे सैनिक दिसू लागले आहेत. 

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. भारत कारवाई करणार या भीतीने पाकिस्तानी लष्करानेही सीमेवरील हालचाली वाढविल्या आहेत. जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.  

पाकिस्तानी लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर रणगाडे, स्वयंचलित तोफखाना व अन्य शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणावर आणण्यास प्रारंभ केला आहे. आम्ही कोणत्याही संघर्षासाठी सज्ज आहोत असा आव पाकिस्तानने आणला असला तरी भारताने याआधी केलेला सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइक यांच्यामुळे पाक लष्कर धास्तावले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत