शहरं
Join us  
Trending Stories
1
३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
2
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
3
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
4
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
5
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
6
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
7
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
8
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
9
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
10
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
11
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
12
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
13
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
14
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
15
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
16
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
17
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
18
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
19
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:10 IST

लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे.

भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ने सीमापार असलेल्या दहशतवादी संघटनांची झोप उडवली आहे. लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे. "तो हल्ला इतका मोठा होता की केवळ अल्लाहनेच आम्हाला वाचवले," अशा शब्दांत रऊफने भारतीय सैन्याच्या अचूक प्रहाराची कबुली दिली आहे. मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा येथे बोलताना या दहशतवाद्याच्या चेहऱ्यावर भारतीय लष्कराची दहशत स्पष्टपणे दिसत होती.

२२ मिनिटांत ९ तळे उद्ध्वस्त!

भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ एक कारवाई नसून तो शत्रूसाठी दिलेला निर्णायक इशारा आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे ऑपरेशन राबवण्याचा संकल्प केला होता. या मोहिमेत भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने त्रिशूळ हल्ला करत अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे अचूक लक्ष्य करून जमीनदोस्त केली.

"मोदींनी पाकिस्तानला ठोकलं, आमची मशीदही पाडली" 

हाफिज रऊफने आपल्या भाषणात सांगितले की, "६-७ मे रोजी मुरीदकेमध्ये जे काही घडले ते भीषण होते. ज्या मशिदीत आम्ही बसतो, त्या मशिदीलाच लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. मोदींनी दावा केला की त्यांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण प्रत्यक्षात त्यांनी थेट पाकिस्तानलाच धडा शिकवला आहे." विशेष म्हणजे, या हल्ल्याची माहिती आधीच असल्याने तेथून मुलांना हटवण्यात आले होते, असेही त्याने कबूल केले.

पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या डोळ्यात पाणी? 

रऊफने आपल्या भाषणात पाकिस्तानच्या असहायतेवरही भाष्य केले. तो म्हणाला, "आमचे लष्कर प्रमुख रडत होते आणि सांगत होते की आमच्याकडे सर्व माहिती होती, तरीही आम्ही काही करू शकलो नाही." भारताच्या या कारवाईमुळे जागतिक बाजारपेठेवर आणि लष्करी रणनीतीवर मोठे परिणाम झाले आहेत. ज्या लढाऊ विमानांचा गवगवा युरोपात होता, ती आता भंगार वाटू लागली आहेत आणि भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे, असेही हाफिजने बडबडताना मान्य केले.

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय लष्कराची ही कारवाई अजून संपलेली नाही. "ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर आहे," असे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले आहे. भारताचा हा आक्रमक पवित्रा पाहून सीमापार असलेल्या दहशतवादी कारखान्यांमध्ये आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor: India's strike rattles terror groups, commander admits defeat.

Web Summary : Operation Sindoor shook terror groups after India destroyed nine bases in 22 minutes. A top commander admitted India's strength, revealing the strike targeted even their mosque. The operation continues, instilling fear across the border, as stated by General Upendra Dwivedi.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान