शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:10 IST

लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे.

भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ने सीमापार असलेल्या दहशतवादी संघटनांची झोप उडवली आहे. लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे. "तो हल्ला इतका मोठा होता की केवळ अल्लाहनेच आम्हाला वाचवले," अशा शब्दांत रऊफने भारतीय सैन्याच्या अचूक प्रहाराची कबुली दिली आहे. मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा येथे बोलताना या दहशतवाद्याच्या चेहऱ्यावर भारतीय लष्कराची दहशत स्पष्टपणे दिसत होती.

२२ मिनिटांत ९ तळे उद्ध्वस्त!

भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ एक कारवाई नसून तो शत्रूसाठी दिलेला निर्णायक इशारा आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे ऑपरेशन राबवण्याचा संकल्प केला होता. या मोहिमेत भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने त्रिशूळ हल्ला करत अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे अचूक लक्ष्य करून जमीनदोस्त केली.

"मोदींनी पाकिस्तानला ठोकलं, आमची मशीदही पाडली" 

हाफिज रऊफने आपल्या भाषणात सांगितले की, "६-७ मे रोजी मुरीदकेमध्ये जे काही घडले ते भीषण होते. ज्या मशिदीत आम्ही बसतो, त्या मशिदीलाच लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. मोदींनी दावा केला की त्यांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण प्रत्यक्षात त्यांनी थेट पाकिस्तानलाच धडा शिकवला आहे." विशेष म्हणजे, या हल्ल्याची माहिती आधीच असल्याने तेथून मुलांना हटवण्यात आले होते, असेही त्याने कबूल केले.

पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या डोळ्यात पाणी? 

रऊफने आपल्या भाषणात पाकिस्तानच्या असहायतेवरही भाष्य केले. तो म्हणाला, "आमचे लष्कर प्रमुख रडत होते आणि सांगत होते की आमच्याकडे सर्व माहिती होती, तरीही आम्ही काही करू शकलो नाही." भारताच्या या कारवाईमुळे जागतिक बाजारपेठेवर आणि लष्करी रणनीतीवर मोठे परिणाम झाले आहेत. ज्या लढाऊ विमानांचा गवगवा युरोपात होता, ती आता भंगार वाटू लागली आहेत आणि भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे, असेही हाफिजने बडबडताना मान्य केले.

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय लष्कराची ही कारवाई अजून संपलेली नाही. "ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमची करडी नजर आहे," असे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले आहे. भारताचा हा आक्रमक पवित्रा पाहून सीमापार असलेल्या दहशतवादी कारखान्यांमध्ये आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor: India's strike rattles terror groups, commander admits defeat.

Web Summary : Operation Sindoor shook terror groups after India destroyed nine bases in 22 minutes. A top commander admitted India's strength, revealing the strike targeted even their mosque. The operation continues, instilling fear across the border, as stated by General Upendra Dwivedi.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान