शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:43 IST

बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे.

बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे. अवघ्या काही दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले असून, सर्वसामान्य लोकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. राजधानी ढाकासह चितगाव, राजशाही आणि खुलना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांदा ११० ते १२० टका प्रति किलो दराने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच कांद्याचा भाव ६० टका प्रति किलो होता, त्यामुळे ही दरवाढ नागरिकांसाठी मोठा धक्का आहे.

भारताच्या निर्यातीवरील बंदीचा थेट परिणाम

बांगलादेशात कांद्याचे दर इतके वाढण्यामागे भारताने निर्यात थांबवणे हे सर्वात मोठे कारण आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील कांद्याचा सध्याचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. याच वेळी, भारताने देशांतर्गत किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा थेट आणि मोठा परिणाम बांगलादेशातील बाजारांवर झाला आहे.

"भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत किंवा बांगलादेशातील नवीन पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे," असे चितगाव आणि राजशाही येथील आयातदारांचे म्हणणे आहे.

व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवड्याचा खेळ?

कंझ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेश या ग्राहक संघटनेने मात्र ही दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. काही व्यापारी कृत्रिमरित्या बाजारात कांद्याची टंचाई दाखवून दर वाढवत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

या कृत्रिम टंचाईचा उद्देश लवकर आयातीची परवानगी मिळवणे हा असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. याचाच अर्थ, काही व्यापाऱ्यांनी साठा दडवून ठेवल्याने बाजारात कांदा दिसत नाही, ज्यामुळे लोकांना जास्त दराने तो खरेदी करावा लागतो.

नवीन पीक येण्यास विलंब, सरकारवर दबाव

यावर्षी बांगलादेशातील रब्बी हंगामातील कांद्याचे पीक तयार होण्यास उशीर होत आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हे पीक बाजारात दाखल होते, पण यावर्षी ते अजून झालेले नाही. आयातदार आणि व्यापाऱ्यांचे मत आहे की, सरकारने तातडीने आयातीची परवानगी दिल्यास दुसऱ्याच दिवशी बाजारातील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते आणि लोकांना दिलासा मिळू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सरकारने बाजारावर कठोर नजर ठेवणे आणि गरजेनुसार वेळेवर आयातीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ आयात सुरू करणे हा एकमेव उपाय नाही, तर साठेबाजी थांबवण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. कांद्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पाणावलेले असताना, आता बांगलादेश सरकार यावर काय उपाययोजना करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Onion Export Ban Brings Tears to Bangladesh, Prices Soar

Web Summary : Bangladesh faces skyrocketing onion prices after India halted exports. Prices surged to 120 Taka/kg, impacting household budgets. Blame is on export ban, hoarding, and delayed local crops. The government is urged to act swiftly.
टॅग्स :onionकांदाBangladeshबांगलादेशIndiaभारत