शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:43 IST

बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे.

बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किंमतीने सध्या अक्षरशः आग लावली आहे. अवघ्या काही दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले असून, सर्वसामान्य लोकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. राजधानी ढाकासह चितगाव, राजशाही आणि खुलना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांदा ११० ते १२० टका प्रति किलो दराने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच कांद्याचा भाव ६० टका प्रति किलो होता, त्यामुळे ही दरवाढ नागरिकांसाठी मोठा धक्का आहे.

भारताच्या निर्यातीवरील बंदीचा थेट परिणाम

बांगलादेशात कांद्याचे दर इतके वाढण्यामागे भारताने निर्यात थांबवणे हे सर्वात मोठे कारण आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील कांद्याचा सध्याचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. याच वेळी, भारताने देशांतर्गत किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा थेट आणि मोठा परिणाम बांगलादेशातील बाजारांवर झाला आहे.

"भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत किंवा बांगलादेशातील नवीन पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे," असे चितगाव आणि राजशाही येथील आयातदारांचे म्हणणे आहे.

व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवड्याचा खेळ?

कंझ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेश या ग्राहक संघटनेने मात्र ही दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. काही व्यापारी कृत्रिमरित्या बाजारात कांद्याची टंचाई दाखवून दर वाढवत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

या कृत्रिम टंचाईचा उद्देश लवकर आयातीची परवानगी मिळवणे हा असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. याचाच अर्थ, काही व्यापाऱ्यांनी साठा दडवून ठेवल्याने बाजारात कांदा दिसत नाही, ज्यामुळे लोकांना जास्त दराने तो खरेदी करावा लागतो.

नवीन पीक येण्यास विलंब, सरकारवर दबाव

यावर्षी बांगलादेशातील रब्बी हंगामातील कांद्याचे पीक तयार होण्यास उशीर होत आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हे पीक बाजारात दाखल होते, पण यावर्षी ते अजून झालेले नाही. आयातदार आणि व्यापाऱ्यांचे मत आहे की, सरकारने तातडीने आयातीची परवानगी दिल्यास दुसऱ्याच दिवशी बाजारातील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते आणि लोकांना दिलासा मिळू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सरकारने बाजारावर कठोर नजर ठेवणे आणि गरजेनुसार वेळेवर आयातीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ आयात सुरू करणे हा एकमेव उपाय नाही, तर साठेबाजी थांबवण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. कांद्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पाणावलेले असताना, आता बांगलादेश सरकार यावर काय उपाययोजना करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Onion Export Ban Brings Tears to Bangladesh, Prices Soar

Web Summary : Bangladesh faces skyrocketing onion prices after India halted exports. Prices surged to 120 Taka/kg, impacting household budgets. Blame is on export ban, hoarding, and delayed local crops. The government is urged to act swiftly.
टॅग्स :onionकांदाBangladeshबांगलादेशIndiaभारत