शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 1:04 PM

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

उत्तर कोरियामध्ये (North Korea) सध्या खाद्य संकट (North Korea Food Crisis) फारच गंभीर होत चाललं आहे. या कारणाने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने लोकांना कमी खाण्याचा क्रूर आदेश दिला आहे. किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

कशामुळे आलं देशात हे संकट

गेल्या बऱ्याच वर्षापासून उत्तर कोरियात खाद्य उत्पादन कमी झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खाण्या-पिण्याचा सप्लाय कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच खाण्या-पिण्याचे भाग आकाशाला भिडले आहेत. किम जोंगने आपल्या निर्णयाला खाद्याच्या कमतरतेला दोषी ठरवत सांगितलं की, 'लोकांची खाद्य स्थिती आाता तणावपूर्ण होत आहे. कारण कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाची योजना अपयशी ठरली'.

कधीपर्यंत राहणार ही स्थिती

उत्तर कोरियातील प्रतिबंध, कोरोना व्हायरस महामारी आणि गेल्यावर्षी आलेल्या वादळामुळेही अन्न-धान्य कमी झालं. किम जोंग उनने काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे जास्त नुकसान झालेल्या भागात सैनिकांना मदत कार्यासाठी पाठवलं होतं. किमने हे मान्य केलं आहे की, देशात सध्या वाईट स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात किमने सांगितलं की, खाद्याचं हे संकट देशात २०१५ पर्यंत राहणार आहे. 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन