शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अहिंसक आंदोलन ठीक, पण बदलासाठी सातत्य हवे; बराक ओबामांनी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 01:19 IST

आपण आपला न्यायासाठीचा राग शांत ठेवून तो जास्त काळ टिकविला तर कार्यप्रणालीमध्ये बदल घडवू शकणार आहोत.

वॉशिंग्टन : कृष्णवर्णीयाच्या पोलीस कोठडीतील मृत्यूवरून अमेरिकेत प्रचंड जाळपोळ, दंगल सुरु आहे. यामध्ये आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उडी घेतली आहे. गेले काही महिने कठीण आणि निराशाजनक गेले असले तरीही तरुणांची आंदोलनातील वाढलेली सक्रियता मोठा बदल घडविण्याची शक्यता ओबामा यांनी व्यक्त केली आहे. 

आपण आपला न्यायासाठीचा राग शांत ठेवून तो जास्त काळ टिकविला तर कार्यप्रणालीमध्ये बदल घडवू शकणार आहोत. जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूच्या न्यायासाठी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले आहेत आणि आवाज उठवत आहेत. मात्र, खरा बदल घडण्यासाठी आपण ही चळवळ कशी सुरु ठेऊ शकणार आहोत, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. मी यासाठी काही सूचना करेन असे ओबामा यांनी सांगितले. 

आज सुरु असलेले हे निषेध आंदोलन न्यायव्यवस्था गेल्या काही दशकांपासून अपयशी ठरल्याचे आणि पोलिसांविरोधातील रोष दर्शविणारे आहे. हिंसाचाराचा मार्ग निवडणाऱ्यांचा आपण निषेध करायलाच हवा. मात्र, काही जण शांततेत आंदोलन करत आहेत ते समर्थनास पात्र, असल्याचे ओबामा म्हणाले. 

आंदोलनाचा मुख्य उद्देश हा जनजागृती करणे, अन्यायावर लक्ष केंद्रित करणे असा आहे. पण जे अपेक्षित असते ते विशिष्ट कायद्यांमध्ये आणि संस्थात्मक प्रणालीमध्ये प्रत्यक्षात आणावे लागणार आहे. हे घडवून आणण्यासाठी सरकारच्या कोणत्या स्तरांवर सर्वात जास्त परिणाम होतो हे आम्हाला माहित असले पाहिजे. फेडरल सरकार बदलणे महत्वाचे आहेच, पण पोलीस विभाग आणि गुन्हेगारी व्यवस्थेत सुधारणा करणेही तेवढेच गरजेचे आहे, असे ओबामा म्हणाले.  

यामुळे जर आपल्याला प्रत्यक्षात बदल आणायचा असेल तर आपल्याला आंदोलन आणि राजकारणापैकी एक निवडायचे नाही. दोन्ही निवडावे लागेल असे ओबामा यांनी सांगितले. जनजागृती करण्यासाठी एकत्र जावे लागेल. तसेच सुधारणावादी उमेदवारांची निवड करावी लागेल. त्यासाठी आपली मतेही ठरवावी लागतील असे ओबामा म्हणाले. 

टॅग्स :Americaअमेरिका