शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:35 IST

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. मात्र ४ दिवसांच्या संघर्षानंतर भारत-पाकिस्तानात सीजफायरची घोषणा करण्यात आली. भारताच्या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने सीजफायरची विनंती केली, ती भारताने मान्य केली. मात्र आता पाकिस्तानसमोर नवं आव्हान निर्माण झाले आहे. बलूचिस्तानच्या चाघी जिल्ह्यात गुरुवारी जे दृश्य समोर आले त्यातून दक्षिण आशियात पुन्हा एकदा अशांतता निर्माण होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अफगाणिस्तानचे सैन्य पाकिस्तानी सीमेत घुसले असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची बातमी समोर आली. हा संघर्ष इतका चिघळला आहे की दोन्ही देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती बनली आहे. चाघी हा तोच भाग आहे जो बलूचिस्तानात डूरंड लाईनजवळ स्थित आहे. डूरंड लाईन ज्याला अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने अवैध घोषित केले होते. इथूनच अफगाणी सैन्य पाकिस्तानात घुसल्याचे समोर आले. या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैन्य मारले गेले आहे. याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत पुष्टी मिळाली नाही.

क्वेटा आणि पेशावर तालिबानचा दावा

अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार डूरंड लाईन मानण्यास तयार नाही. त्यांनी ही सीमा अवैध असल्याचं म्हटलं नाही तर क्वेटा आणि पेशावरसारख्य पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर दावाही केला आहे. पाकिस्तानी सैन्य वारंवार सीमेत घुसखोरी करते असा तालिबानचा आरोप आहे. त्यावर तहरीक ए पाकिस्तान आणि तालिबान मिळून आमच्या सैन्यावर आणि चौक्यांवर हल्ला करते असा पलटवार पाकिस्तानने केला आहे. 

पाकिस्तानला दुहेरी फटका

पाकिस्तानात आधीच बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि TTP सारख्या दहशतवादी संघटनांकडून दुहेरी मार बसत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या सैन्य तळांवर हल्ले होत आहेत अशावेळी अफगाणी सैन्य पाकच्या सीमेत घुसखोरी करून गोळीबार करत असल्याने पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच ताणले गेलेत. डिसेंबर २०२४ मध्ये खोस्त आणि पक्तिया येथे झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. आता चाघी जिल्ह्यातील चकमक त्याचाच पुढचा भाग मानली जात आहे. 

२ तास गोळीबार

स्थानिक माध्यमांनुसार, बलूचिस्तानच्या हेलमंद सीमेवर २ तास गोळीबारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने छोट्या शस्त्रांचा वापर केला. गोळीबारीनंतर पाकिस्तानकडून सीमेवर नव्या चौक्यांच्या बांधकामाचे काम थांबवण्यात आले. कुठल्याही किंमतीत आम्ही डूरंड लाईनजवळ पाकिस्तानला नवीन चौकी बांधून देणार नाही असं तालिबानने सांगितले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत