शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:35 IST

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. मात्र ४ दिवसांच्या संघर्षानंतर भारत-पाकिस्तानात सीजफायरची घोषणा करण्यात आली. भारताच्या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने सीजफायरची विनंती केली, ती भारताने मान्य केली. मात्र आता पाकिस्तानसमोर नवं आव्हान निर्माण झाले आहे. बलूचिस्तानच्या चाघी जिल्ह्यात गुरुवारी जे दृश्य समोर आले त्यातून दक्षिण आशियात पुन्हा एकदा अशांतता निर्माण होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अफगाणिस्तानचे सैन्य पाकिस्तानी सीमेत घुसले असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची बातमी समोर आली. हा संघर्ष इतका चिघळला आहे की दोन्ही देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती बनली आहे. चाघी हा तोच भाग आहे जो बलूचिस्तानात डूरंड लाईनजवळ स्थित आहे. डूरंड लाईन ज्याला अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने अवैध घोषित केले होते. इथूनच अफगाणी सैन्य पाकिस्तानात घुसल्याचे समोर आले. या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैन्य मारले गेले आहे. याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत पुष्टी मिळाली नाही.

क्वेटा आणि पेशावर तालिबानचा दावा

अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार डूरंड लाईन मानण्यास तयार नाही. त्यांनी ही सीमा अवैध असल्याचं म्हटलं नाही तर क्वेटा आणि पेशावरसारख्य पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर दावाही केला आहे. पाकिस्तानी सैन्य वारंवार सीमेत घुसखोरी करते असा तालिबानचा आरोप आहे. त्यावर तहरीक ए पाकिस्तान आणि तालिबान मिळून आमच्या सैन्यावर आणि चौक्यांवर हल्ला करते असा पलटवार पाकिस्तानने केला आहे. 

पाकिस्तानला दुहेरी फटका

पाकिस्तानात आधीच बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि TTP सारख्या दहशतवादी संघटनांकडून दुहेरी मार बसत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या सैन्य तळांवर हल्ले होत आहेत अशावेळी अफगाणी सैन्य पाकच्या सीमेत घुसखोरी करून गोळीबार करत असल्याने पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच ताणले गेलेत. डिसेंबर २०२४ मध्ये खोस्त आणि पक्तिया येथे झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. आता चाघी जिल्ह्यातील चकमक त्याचाच पुढचा भाग मानली जात आहे. 

२ तास गोळीबार

स्थानिक माध्यमांनुसार, बलूचिस्तानच्या हेलमंद सीमेवर २ तास गोळीबारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने छोट्या शस्त्रांचा वापर केला. गोळीबारीनंतर पाकिस्तानकडून सीमेवर नव्या चौक्यांच्या बांधकामाचे काम थांबवण्यात आले. कुठल्याही किंमतीत आम्ही डूरंड लाईनजवळ पाकिस्तानला नवीन चौकी बांधून देणार नाही असं तालिबानने सांगितले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत