शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:48 IST

नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे.

नेपाळमधील 'जेन झी' आंदोलन आता काहीस थंड झालं असलं, तरी अजून तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. या आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण मंत्रीमंडळाला राजीनामा द्यावा लागला. इतकंच काय तर, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. गेल्या २ दिवसांपासून अनेक मंत्र्यांना 'जेन-झी' आंदोलनकर्त्यांचा मारही खावा लागला. मात्र, या दरम्यान पंतप्रधान कुठेच दिसले नाहीत. नेपाळचे पंतप्रधान देश सोडून पळून गेले, असा कयास लोकांनी बांधला होता. मात्र, ते नेमके कुठे गेले याची माहिती कुणालाच नाही. माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे. स्वत: केपी शर्मा ओली यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. यात त्यांनी सगळ्या चर्चांना स्वतः पूर्ण विराम देत आपण आता कुठे आहोत, हे सांगितले आहे. 

कुठे आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान?नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे चीन किंवा दुबई नाही तर नेपाळमध्ये थांबले आहेत. नेपाळच्या शिवपुरी भागात कडक सुरक्षेत त्यांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी सेनेने घेतली आहे. केपी शर्मा ओली यांनी शेअर केलेल्या पत्रात तरुणांना आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले की, सध्या ते सैनिकांच्या सुरक्षेत असून, या सगळ्या हल्लाकल्लोळात देखील त्यांना देशातील तरुणांची आणि लहान मुलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, लहान बाळांचं हसू आणि तरुणांचा स्नेह मला रोमांचित करत राहील. 

काय म्हणाले केपी शर्मा ओली?

या आंदोलनाबद्दल आपलं मत मांडताना मनातील वेदना देखील व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, देश सांभाळताना परिवर्तनाच्या लढाईत मी स्वतः अपत्य सुखापासून वंचित राहिलो. मात्र, बाबा बनण्याची माझी ओढ कधीच कमी झाली नाही. यावेळी त्यांनी लोकांना याचीही आठवण करून दिली, जेव्हा ते नेपाळ गृहमंत्री होते, त्या काळात देशात एकही गोळी चालली नव्हती. 

सध्या देशात सुरू असलेले 'जेन-झी' आंदोलन हा तरुणांचा खरा आवाज नसून, ते मोठं षडयंत्र असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये आग लावणे, तुरुंगातून कैद्यांना मुक्त करणे, हे एखाद्या आनंदोलनाचा भाग असूच शकत नाही. जी लोकशाही व्यवस्था संघर्ष आणि बलिदान देऊन मिळवली आहे, आज तीच व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे, त्यांनी म्हटले.   

टॅग्स :Nepalनेपाळagitationआंदोलन