शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

चिलीत वाढताहेत फॅशनेबल 'कपड्यांचे डोंगर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 05:45 IST

दरवर्षी २९००० टन नवीन, कुठेही विकले न गेलेले कपडे असे चिलीच्या अटाकामा वाळवंटात टाकून दिले जातात. एक टन म्हणजे १००० किलो. असा विचार केला तर हे कपडे किती प्रचंड जागा व्यापत असतील हे लक्षात येऊ शकतं.

ठळक मुद्देबाजारपेठेत हे सगळे कपडे विकले जाऊ शकत नाहीत. असे कुठेच विकले न गेलेले कपडे मग चिलीच्या वाळवंटात टाकून दिले जातात. असे फेकून दिलेले हे कपडे असतात तरी किती? 

अन्न-वस्त्र-निवारा या खरं पाहिलं तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पण नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर या तीनही बाबी मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आयुष्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. त्याचा अतिरेक होत आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त वापरण्याची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे पराकोटीची विषमता उदयाला आली आहे. पण त्यातही अतिशय भयंकर परिस्थिती वस्त्रांच्या अतिरेकाने निर्माण होत आहे आणि ती केवळ अतिरेक करणाऱ्यांच्या आयुष्यात निर्माण होत नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. सातत्यानं कपडे खरेदी करायचे आणि ते वापरून किंवा न वापरता, थोडेसेच वापरून फेकून द्यायचे, ही जणू नवी संस्कृती निर्माण झाली आहे. कपडे उर्फ फॅशन ही त्यातल्या त्यात सहज परवडण्याजोगी चैन असल्यामुळे जगाच्या पाठीवरची खूप मोठी लोकसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणावर कपडे खरेदी करत असते. त्यातही युरोप आणि अमेरिकेत सतत बदलणाऱ्या फॅशनच्या कपड्यांचं मार्केट खूप मोठं आहे.

फास्ट फॅशनसाठीचे हे कपडे प्रामुख्याने चीन आणि बांगलादेशात तयार केले जातात. तिथून हे कपडे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत पाठवले जातात. एजन्सी फ्रान्स प्रेस यांच्या निरीक्षणानुसार तिथे जे कपडे विकले जात नाहीत ते ५९००० टन कपडे चिली देशाच्या इकिक बंदरात दरवर्षी आणले जातात. तिथून हे कपडे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये म्हणजे मुख्यतः दक्षिण अमेरिका खंडात विकायला पाठवले जातात. परंतु त्याही बाजारपेठेत हे सगळे कपडे विकले जाऊ शकत नाहीत. असे कुठेच विकले न गेलेले कपडे मग चिलीच्या वाळवंटात टाकून दिले जातात. असे फेकून दिलेले हे कपडे असतात तरी किती? 

दरवर्षी २९००० टन नवीन, कुठेही विकले न गेलेले कपडे असे चिलीच्या अटाकामा वाळवंटात टाकून दिले जातात. एक टन म्हणजे १००० किलो. असा विचार केला तर हे कपडे किती प्रचंड जागा व्यापत असतील हे लक्षात येऊ शकतं. चिली देशात असलेल्या वाळवंटाचा कितीतरी भाग आता या टाकून दिलेल्या कपड्यांनी व्यापला आहे.  वाळवंटात या कपड्यांची नीट विल्हेवाट न लावता ते असे का टाकून दिले जातात? तर हे कपडे तयार करतांना त्यात हानिकारक रसायनं वापरलेली असतात आणि त्या कपड्यांचं जैव विघटन होऊ शकत नाही. म्हणजेच त्यावर प्रक्रिया करून त्याचं खत तयार करणं किंवा ते मातीत मिसळून टाकणं असं काही करता येऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेचा कचरा डेपो हे कपडे आपल्या हद्दीत येऊ देत नाही.याचाच अर्थ असा की, हे टाकून दिलेले कपडे पुढील कित्येक वर्षं तसेच त्या वाळवंटात पडून राहणार आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी व्यापलेली जागाही उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कडक उन्हाने हे कपडे कालौघात खराब होतील, त्यांच्या चिंध्या होतील, त्यांचे अगदी बारीक कण होतील, पण ते कधीही खऱ्या अर्थाने मातीत मिसळणार नाहीत. फॅशन उद्योगाने पर्यावरणाचा कसा आणि किती नाश होतोय याचं हे एक उदाहरण आहे. पण तरीही फॅशन उद्योगाने केलेल्या एकूण नुकसानात याचा वाटा तसा कमी आहे.

फॅशन उद्योगामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा एकूण जागतिक उत्सर्जनातील वाटा ८ ते १० टक्के आहे असं संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. २०१८ साली असं लक्षात आलं होतं, की जगभरातील हवाईमार्ग आणि समुद्रीमार्गावरील एकूण वाहतुकीने एकत्रितपणे जेवढी ऊर्जा वापरली त्याहून जास्त ऊर्जा एकट्या फॅशन उद्योगात वापरली जाते. ब्रिटनमधील ॲलन मॅकआर्थर फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार २००४ ते २०१९ या काळात कपड्यांचं उत्पादन दुप्पट झालं आहे. २००० सालापेक्षा २०१४ साली ग्राहक कपड्यांची खरेदी ६० टक्के जास्त करत होते. आणि अर्थातच त्यात तयार झालेल्या, वापरल्या गेलेल्या आणि न वापरल्या गेलेल्या प्रत्येक कपड्याने पर्यावरणाचा काहीतरी लचका तोडलेलाच आहे.

हौस आणि चैन कमी होणार का?फॅशन इंडस्ट्रीला आर्थिक फायदा करून देण्यासाठी आपण दुहेरी किंमत मोजतोय. पैसेही देतोय आणि पर्यावरणाचं नुकसानाही करतोय. त्यातला खरा दैवदुर्विलास हा आहे की ही किंमत जगातला प्रत्येक माणूस मोजतो आहे, मोजणार आहे. ज्याला अंग झाकायला पुरेसे कपडे मिळत नाहीत अशीही माणसं या अतिरिक्त कपड्यांच्या उत्पादनाची किंमत मोजणार आहेत. पण उपभोगाची ही अधिकाधिक वेगाने फिरणारी चक्रं थांबवणं आणि उलटी फिरवणं हे सोपं नाही. कारण त्यासाठी गरज, हौस आणि चैन यातल्या सीमारेषा नव्याने आखण्याची गरज आहे. माणसांनी खरेदी कमी केली तर उत्पादन कमी करावंच लागतं. प्रश्न असा आहे, की माणसं स्वतःच्या गरजा कमी करतील का? हौस तरी कमी करतील का? किमान हौस भागल्यानंतरची चैन तरी कमी करतील का? आणि त्याहून मोठा प्रश्न हा आहे, की ती चैन कमी न करण्याची चैन माणसांना आता परवडणार आहे का?

टॅग्स :fashionफॅशन