तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 17:54 IST2025-05-04T17:54:22+5:302025-05-04T17:54:48+5:30

इस्रायलमधील तेल अवीवच्या विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर एअर इंडियाचे विमान अबू धाबी येथे उतरवण्यात आले आहे.

Missile attack on Israel airport Air India Tel Aviv bound flight diverted to Abu Dhabi | तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले

तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले

Ben Gurion Airport Attack:  इस्रायलच्या तेल अवीवमधील विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर एअर इंडियाचे विमान अबू धाबीकडे वळवण्यात आले आहे. रविवारी दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे हे विमान हल्ल्यानंतर अबू धाबीला वळवण्यात आले. इस्रायली विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे वळवण्यात आले. विमानतळाजवळ एक प्राणघातक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय १३९ तेल अवीवमध्ये उतरण्याच्या एक तासापूर्वीच हा हल्ला झाला.

रविवारी सकाळी बेन गुरियन विमानतळावर झालेल्या एका या घटनेनंतर, दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान तातडीने अबू धाबीला वळवण्यात आले. इस्रायली विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे वळवण्यात आले. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमान अबू धाबीमध्ये सुरक्षितपणे उतरले असून लवकरच ते दिल्लीला परत येणार आहे. मात्र या घटनेनंतर, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी सर्व उड्डाणे तात्काळ प्रभावाने ६ मे पर्यंत स्थगित केली आहेत.

"४ मे २०२५ रोजी दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १३९ हे आज सकाळी बेन गुरियन विमानतळावर झालेल्या घटनेनंतर अबू धाबीला वळवण्यात आले. विमान अबू धाबीमध्ये उतरले आहे आणि लवकरच दिल्लीला परत येईल. परिणामी, आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तेल अवीवला जाणारे आणि तेथून जाणारे आमचे उड्डाण ६ मे २०२५ पर्यंत तात्काळ बंद राहील. आमचे कर्मचारी ग्राहकांना मदत करत आहेत. एअर इंडियामध्ये, आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे," असं एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.