शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर क्षेपणास्त्रांचा थेट हल्ला करू; पाकिस्तानची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 2:53 AM

पाकिस्तानचे मंत्री अली अमीन यांची विखारी धमकी

इस्लामाबाद : काश्मीरच्या प्रश्नावर जो देश भारताची बाजू घेईल तो पाकिस्तानचा शत्रू असेल व अशा देशावर पाकिस्तान क्षेपणास्त्राने हल्ला करील, अशी विखारी धमकी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने केली आहे.

पाकिस्तानचे काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान बाबींचे मंत्री अली अमीन गंडापूर मंगळवारी येथे एका कार्यक्रमात म्हणाले की, काश्मीरच्या प्रश्नावर तणाव आणखी वाढत गेला तर पाकिस्तानला नाइलाजाने युद्ध पुराकावे लागेल. त्यामुळे असे युद्ध जेव्हा होईल तेव्हा भारताला पाठिंबा देशांनाही पाकिस्तानचे शत्रू मानले जाईल व भारतासोबत अशा देशांवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जाईल. पाकिस्तानमधील एक पत्रकार नायला इनायत यांनी मंत्री गंडापूर यांच्या या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ टिष्ट्वटरवर प्रसारित केला आहे.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने त्यानंतर भारतासोबतचे राजनैतिक संबंध कनिष्ठ पातळीवर आणले व संधी मिळेल तेव्हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतावर बेछूट आरोप केले. पण बहुतेक सर्वच देशांनी काश्मीरच्या प्रश्नावर भारताचीच बाजू घेतली आहे. मंत्री गंडापूर यांचे आताची ही वल्गना त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत केलेल्या भाषणाचीच री ओढणारी आहे.

संयुक्त राष्ट्रांतील संपूर्ण ५० मिनिटांचे भाषण इम्रान खान यांनी काश्मीरवरून भारतावर आगपाखड करण्यात खर्ची घातले होते. काश्मीरवरून भारताशी कदाचित अणुयुद्धालाही तोंड लागू शकेल, असा गर्भित इशारा देत इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना, ‘चांगलीची आशा करा, पण वाईटात वाईटाचीही तयारी ठेवा’, असे सांगितले होते. (वृत्तसंस्था)शरणागती वा सोक्षमोक्षइम्रान खान म्हणाले होते, ‘युद्धाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली तरी अण्वस्त्रधारी देश जेव्हा प्राणपणाने लढतो तेव्हा त्या युद्धाचे परिणाम त्या देशांच्या सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत. आपल्याहून सातपट मोठ्या देशाशी लढताना छोटा देश काय करील? एक तर शरणागती पत्करेल किंवा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लढेल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान