शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

किशनगंगा प्रकरणी जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका, भारताचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:05 IST

भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला आहे.

इस्लामाबाद -  भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला आहे. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने किंशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.  जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग यांनी पाकिस्तानने किशनगंगा विवादाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा आपला निर्णय बदलावा असा सल्ला गेल्या आठवड्यात  दिल्याचे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने  प्रसिद्ध केले आहे. सिंधू नदीवरील भारताचे अनेक प्रकल्प हे जागतिक बँकेच्या मध्यस्तीने 1960 साली झालेल्या सिंधू पाणी कराराचे भंग करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून नेहमीच करण्यात येत असतो.  जागतिक बँकेने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप निश्चित करण्यासाठी हा करार करवून घेतला होता. सद्यस्थितीत सिंधूनदीच्या पाण्यावर पाकिस्तानमधील सिंचनाखालील 80 टक्के शेतीला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिंधू नदीवर धरण बांधल्यास नदीचा मार्ग बदलेल तसेच पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीमध्येही कमालीची घट होईल, अशी भीती व्यक्त करत या वादाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात व्हायला हवी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. दुसरीकडे भारताने मात्र सिंधू पाणी करारानुसार जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा आपल्याला अधिकार आहे. तसेच यामुळे नदीचा प्रवाह आणि पाणीपातळीमध्ये कोणत्याही प्रकारची घट होणार नसल्याचा दावा केला आहे. या धरणाच्या आराखड्याबाबत पाकिस्तानसोबत असलेला वाद सोडवण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :riverनदीWaterपाणीDamधरणPakistanपाकिस्तान