शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:06 IST

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल..."

पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना आणि युद्धाची शक्यता दिसत असतानाच खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने एक मोठी घोषणा केली आहे. जर भारतानेपाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल, अशी धमकी पन्नूने दिली आहे. तो शीख फॉर जस्टिस (SFJ) नावाची बंदी असलेली संघटनाही चालवतो. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कुठल्याही प्रकारचे युद्ध म्हणजे, पंजाबसाठी भारतापासून विभक्त होण्याची एक संधी, असे पन्नूने म्हटले आहे. 

पन्नूने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर पंजाब भारतापासून वेगळा करून खलिस्तान तयार केला जाईल. भारताने पंजाबवर कब्जा करून ठेवला आहे. अशा परिस्थितीत पंजाबमधील लोक भारतीय सैन्याविरुद्ध उभे राहतील. शीख समुदाय पाकिस्तानी सैन्याचे समर्थन करेल आणि यांच्यासाठी लंगरची व्यवस्था करेल.

पन्नूने पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी खलिस्तानचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करावा आणि आणि पंजाबमध्ये जनमत चाचणी घ्यावी. पंजाबमध्ये भारतीय सैन्याविरोधात आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. लोक शीख सैनिकांना पाकिस्तानविरुद्ध लढण्यास विरोध करत आहेत. एवढेच नाही तर, हे युद्ध भारतासाठी अत्यंत महाग ठरेल. जर भारताने युद्ध केले तर त्याचे तुकडे होतील, असेही पन्नूने म्हटले आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरुद्ध विधाने करत आहे. त्याने कॅनडा आणि इतर काही देशांत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह पुतळे तयार करून रॅली देखील काढल्या आहेत. भारतापासून पंजाब वेगळा करून खलिस्तान नावाचा नवा देश तयार करू, असेही तो वारंवार म्हणत असतो. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब