शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:06 IST

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल..."

पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना आणि युद्धाची शक्यता दिसत असतानाच खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने एक मोठी घोषणा केली आहे. जर भारतानेपाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल, अशी धमकी पन्नूने दिली आहे. तो शीख फॉर जस्टिस (SFJ) नावाची बंदी असलेली संघटनाही चालवतो. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कुठल्याही प्रकारचे युद्ध म्हणजे, पंजाबसाठी भारतापासून विभक्त होण्याची एक संधी, असे पन्नूने म्हटले आहे. 

पन्नूने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर पंजाब भारतापासून वेगळा करून खलिस्तान तयार केला जाईल. भारताने पंजाबवर कब्जा करून ठेवला आहे. अशा परिस्थितीत पंजाबमधील लोक भारतीय सैन्याविरुद्ध उभे राहतील. शीख समुदाय पाकिस्तानी सैन्याचे समर्थन करेल आणि यांच्यासाठी लंगरची व्यवस्था करेल.

पन्नूने पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी खलिस्तानचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करावा आणि आणि पंजाबमध्ये जनमत चाचणी घ्यावी. पंजाबमध्ये भारतीय सैन्याविरोधात आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. लोक शीख सैनिकांना पाकिस्तानविरुद्ध लढण्यास विरोध करत आहेत. एवढेच नाही तर, हे युद्ध भारतासाठी अत्यंत महाग ठरेल. जर भारताने युद्ध केले तर त्याचे तुकडे होतील, असेही पन्नूने म्हटले आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरुद्ध विधाने करत आहे. त्याने कॅनडा आणि इतर काही देशांत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह पुतळे तयार करून रॅली देखील काढल्या आहेत. भारतापासून पंजाब वेगळा करून खलिस्तान नावाचा नवा देश तयार करू, असेही तो वारंवार म्हणत असतो. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब