शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:40 IST

Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते.

इस्रायलनेइराणवर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. लष्करी ठिकाण्यांवर हल्ले होत असताना नागरिकही मारले जात आहेत. यामुळे सुमारे १५०० विद्यार्थ्यांसह १० हजार भारतीय नागरिक इस्रायलच्या हवाई हल्ल्यांखाली जीव मुठीत घेऊन मदतीची हाक देत आहेत. इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच फोन लावला तर १५-१६ वेळा डायल करावा लागत आहे. अशातच इराणच्या शेजारील देश आर्मेनियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. 

इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. यामुळे परदेशी नागरिकांबरोबरच स्थानिक इराणी नागरिकांनी देखील इराणबाहेर पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून या प्रचंड वाहतुकीचे फोटो येत आहेत. 

अशातच भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी  भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदुतांशी संपर्क साधला होता. कारण ११० विद्यार्थी सोमवारी आर्मेनियाच्या बॉर्डरवर पोहोचले होते. इराण सोडण्यापूर्वी, परदेशी नागरिकांना त्यांचे नाव, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ओलांडायची असलेली सीमा राजनैतिक मिशनद्वारे इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला द्यावी लागणार आहे. 

आर्मेनिया हा भारताचा चांगला मित्र देश आहे. अनेक संरक्षण करार उभयतांत झालेले आहेत. तसेच इराणची महत्वाची शहरे या देशापासून अत्यंत जवळ आहेत. इराणमधून भारतीयांना आर्मेनियात सहज प्रवेश दिला जाणार आहे. तिथून हे भारतीय येरेवन विमानतळावर येणार आहेत. या विमानतळावरून या लोकांना पु्हा भारतात आणले जाणार आहे. इराण आणि आर्मेनियामध्ये सध्या कोणताही सीमा वाद किंवा लष्करी तणाव नसल्याने भारतासाठी हे सोपे गेले आहे. 

भारत-इराणच्या मध्ये पाकिस्तानही होता...भारत आणि इराणच्या मध्ये पाकिस्तान देखील आहे. परंतू, भारताचे पाकिस्तानसोबत संबंध ताणलेले आहेत. गो इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानने संकटकाळात येऊ दिले  नव्हते, तर या भारतीयांना मदत करणे दूर राहिले. तसेच अफगाणिस्तान देखील यात आहे. अफगाणिस्तानसोबतही भारताचे चांगले संबंध आहेत. परंतू, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा वाद आहे. यामुळे भारताने आर्मेनियाला निवडले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धPakistanपाकिस्तान