शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:19 IST

इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणनेइस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यानंतर, आता इस्रायल-इराण संघर्षात भारताचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इराणचे राजदूत इराज इलाही यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. मध्यपूर्वेत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे इराज इलाही यांनी म्हटले आहे. याशिवाय, इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणचा इस्रायलला इशारा -इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही एनडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले, इराणचा हल्ला म्हणजे इस्रायलला प्रत्युत्तर आहे. एवढेच नाही तर, इस्रायलने इराणच्या संपत्तीवर आणि त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले करणे सुरूच ठेवले, तर इराण पुन्हा पुन्हा हल्ले करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना इराज इलाही म्हणाले, इस्रायलकडून जे हल्ले केले जात आहेत, त्याकडे संपूर्ण जगातील लोकांचे लक्ष आहे. इस्रायलने सर्व मानवाधिकार कराराचे उल्लंघन केले आहे. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने रक्तपात होत आहे. यामुळे लोक संतप्त आहेत.

यापुढे बोलताना ते म्हणाले, इस्रायली पंतप्रधान या शतकातील 'नवे हिटलर' आहेत. इस्रायलवरील मिसाइल हल्ले म्हणजे प्रत्युत्तरात केलेली कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, इराण आपल्या आंतरराष्ट्रीय हीत आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसंदर्भात चेष्टा करत नाही. 

'भारताचा दोन्ही देशांसोबत घनिष्ठ संबंध' - इराज इलाही म्हणाले, मिडिल ईस्टमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामागचे कारण सांगताता इलाही म्हणाले, भारताचा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत घनिष्ट संबंध आहे. इस्रायलला समजावण्यात आणि रोखण्यात भारत मदद करेल, अशी आशाही इराज इलाही यांनी व्यक्त केली आहे. यावेळी, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'हे युद्धाचे युग नाही', या विधानाचा उल्लेख करत, आम्ही इराणमध्येही हे मानतो, पण जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला केला तर तो देश काय  करू शखतो?' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत