शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:19 IST

इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणनेइस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यानंतर, आता इस्रायल-इराण संघर्षात भारताचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इराणचे राजदूत इराज इलाही यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. मध्यपूर्वेत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे इराज इलाही यांनी म्हटले आहे. याशिवाय, इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.

इराणचा इस्रायलला इशारा -इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही एनडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले, इराणचा हल्ला म्हणजे इस्रायलला प्रत्युत्तर आहे. एवढेच नाही तर, इस्रायलने इराणच्या संपत्तीवर आणि त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले करणे सुरूच ठेवले, तर इराण पुन्हा पुन्हा हल्ले करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना इराज इलाही म्हणाले, इस्रायलकडून जे हल्ले केले जात आहेत, त्याकडे संपूर्ण जगातील लोकांचे लक्ष आहे. इस्रायलने सर्व मानवाधिकार कराराचे उल्लंघन केले आहे. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने रक्तपात होत आहे. यामुळे लोक संतप्त आहेत.

यापुढे बोलताना ते म्हणाले, इस्रायली पंतप्रधान या शतकातील 'नवे हिटलर' आहेत. इस्रायलवरील मिसाइल हल्ले म्हणजे प्रत्युत्तरात केलेली कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, इराण आपल्या आंतरराष्ट्रीय हीत आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसंदर्भात चेष्टा करत नाही. 

'भारताचा दोन्ही देशांसोबत घनिष्ठ संबंध' - इराज इलाही म्हणाले, मिडिल ईस्टमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामागचे कारण सांगताता इलाही म्हणाले, भारताचा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत घनिष्ट संबंध आहे. इस्रायलला समजावण्यात आणि रोखण्यात भारत मदद करेल, अशी आशाही इराज इलाही यांनी व्यक्त केली आहे. यावेळी, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'हे युद्धाचे युग नाही', या विधानाचा उल्लेख करत, आम्ही इराणमध्येही हे मानतो, पण जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला केला तर तो देश काय  करू शखतो?' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत