शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:09 IST

पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. भारताच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून, त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी मांडली होती. त्याबद्दल पाकिस्तानने म्हटले आहे की, अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडू शकतात. काश्मीरमध्ये भारताकडून सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली होत असून, त्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने टीका केली आहे. त्यामुळे हताश झालेला भारत बेजबाबदार वक्तव्ये करीत आहे.पाकिस्तानने सांगितले की, भारत काश्मीरमधील निरपराध लोकांचा छळ करीत असून, त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. दुसऱ्यांना दुषणे देण्यापेक्षा भारताने काश्मीरमधील निर्बंध हटवावेत, आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणे थांबवावे, तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी भारताने करावी. (वृत्तसंस्था)>भारताची ठाम भूमिकाकाश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे निर्णय केंद्र सरकारने घेतले.या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडली. त्याशिवाय भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविले, राजनैतिक संबंध कमी केले. तरीही पाकिस्तानच्या कांगाव्याला जगभरातून पाठिंबा मिळाला नाही.काश्मीरचा प्रश्न भारत व चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशीच भूमिका हे देश व संयुक्त राष्ट्रांनी घेतल्याने पाकिस्तान आणखी बिथरला आहे.३७० कलम रद्द करणे हा आमचा अंतर्गत मामला आहे व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370