शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 6:08 AM

पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. भारताच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून, त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी मांडली होती. त्याबद्दल पाकिस्तानने म्हटले आहे की, अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडू शकतात. काश्मीरमध्ये भारताकडून सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली होत असून, त्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने टीका केली आहे. त्यामुळे हताश झालेला भारत बेजबाबदार वक्तव्ये करीत आहे.पाकिस्तानने सांगितले की, भारत काश्मीरमधील निरपराध लोकांचा छळ करीत असून, त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. दुसऱ्यांना दुषणे देण्यापेक्षा भारताने काश्मीरमधील निर्बंध हटवावेत, आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणे थांबवावे, तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी भारताने करावी. (वृत्तसंस्था)>भारताची ठाम भूमिकाकाश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे निर्णय केंद्र सरकारने घेतले.या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडली. त्याशिवाय भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविले, राजनैतिक संबंध कमी केले. तरीही पाकिस्तानच्या कांगाव्याला जगभरातून पाठिंबा मिळाला नाही.काश्मीरचा प्रश्न भारत व चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशीच भूमिका हे देश व संयुक्त राष्ट्रांनी घेतल्याने पाकिस्तान आणखी बिथरला आहे.३७० कलम रद्द करणे हा आमचा अंतर्गत मामला आहे व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370