संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानातील परिस्थितीबद्दलच्या ब्रीफिंग दरम्यान, भारताने देशातील चालू मानवतावादी संकट, सीमापार हिंसाचार आणि व्यापार निर्बंधांबद्दल चिंता व्यक्त केली. या कृतींसाठी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश पार्वतनेनी यांनी बैठकीत भारताची भूमिका मांडली. अफगाणिस्तानला नवी दिल्लीचा सतत पाठिंबा असल्याचे पुन्हा सांगितले. त्यांनी नागरी हताहती, निर्वासितांना सक्तीने मायदेशी परत पाठवणे आणि भूपरिवेष्ठित देशासाठी व्यापार अडथळे यासारख्या गंभीर मुद्द्यांकडेही परिषदेचे लक्ष वेधले.
राजदूत पर्वतानेनी यांनी भारताचे अफगाणिस्तानशी असलेले दीर्घकालीन संबंध नमूद केले. विकास उपक्रम, आरोग्य सहाय्य आणि क्षमता-निर्मिती कार्यक्रमांद्वारे अफगाणिस्तानच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने अफगाणिस्तानच्या सर्व ३४ प्रांतांमध्ये ५०० हून अधिक विकास भागीदारी प्रकल्प राबविले आहेत. अन्न सुरक्षा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि क्रीडा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत संयुक्त राष्ट्रांच्या (UN) संस्था आणि स्थानिक संस्थांसोबत जवळून काम करत आहे.
अफगाण तरुणांमध्ये क्रिकेटची आवड
भारतीय राजदूतांनी अफगाण तरुणांमध्ये क्रिकेटबद्दल वाढत्या उत्साहाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, "आज अफगाणिस्तानला भेट देणारा कोणीही तिथल्या तरुणांना मोठ्या उत्साहाने क्रिकेट खेळताना पाहू शकतो. अफगाण क्रिकेट संघ जिथे जिथे खेळतो तिथे तिथे लोकांची मने जिंकत आहे." नुकत्याच संपलेल्या क्रिकेट विश्वचषकात अफगाण संघाच्या उत्साहाचे कौतुक करताना, त्यांनी सांगितले की, भारताला त्यांच्या प्रवासाचा भाग असल्याचा अभिमान आहे, ते या कठीण काळात अफगाण लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणत आहेत.
निर्वासितांच्या जबरदस्तीने परतण्याबाबत चिंता
भारताने अफगाणिस्तानसमोरील मानवतावादी दबावांना, निर्वासितांच्या परतीच्या मुद्द्यालाही संबोधित केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या अहवालाचा हवाला देत, भारताने सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय दायित्वांचे पालन करण्याचे आवाहन केले. निर्वासितांचे परतणे ऐच्छिक, सुरक्षित आणि सन्माननीय असले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या समुदायात पुन्हा एकत्र येण्यासाठी सतत मदत मिळाली पाहिजे यावर भारताने भर दिला.
अमेरिकेने अफगाणिस्तानला दिला धक्का
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अधिकृतपणे अफगाणिस्तानला 'अन्याय्य अटकेचे राज्य पुरस्कृत' म्हणून घोषित केले आहे. त्यांनी सत्ताधारी तालिबानने अन्याय्यपणे ताब्यात घेतलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना तात्काळ सोडण्याची मागणीही केली आहे.
सोमवारी जारी केलेल्या निवेदनात, रुबियो यांनी तालिबानवर जोरदार टीका केली. हा गट दहशतवादी डावपेचांचा वापर करत आहे आणि खंडणी किंवा धोरणात्मक सवलती मिळविण्यासाठी लोकांचे अपहरण करत आहे, असा आरोपही केला. परराष्ट्र सचिवांनी स्पष्टपणे सांगितले की, या घृणास्पद डावपेच थांबल्या पाहिजेत. त्यांनी विशेषतः डेनिस कोयल, महमूद हबीबी आणि सध्या अफगाणिस्तानात अन्याय्यपणे ताब्यात घेतलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना सोडण्याची मागणी केली. त्यांनी तालिबानला ओलिस राजनैतिकतेची ही पद्धत कायमची बंद करण्याचे आवाहनही केले.
Web Summary : India criticized Pakistan's actions in Afghanistan at the UN, highlighting humanitarian concerns and trade barriers. The US labeled Afghanistan a state sponsor of unjust detentions, demanding the release of detained Americans. India emphasized its commitment to Afghanistan's development and the well-being of its people.
Web Summary : भारत ने संयुक्त राष्ट्र में अफ़ग़ानिस्तान में पाकिस्तान की हरकतों की आलोचना की, मानवीय चिंताओं और व्यापार बाधाओं पर प्रकाश डाला। अमेरिका ने अफ़ग़ानिस्तान को अन्यायपूर्ण हिरासत का राज्य प्रायोजक करार दिया, और हिरासत में लिए गए अमेरिकियों की रिहाई की मांग की। भारत ने अफ़ग़ानिस्तान के विकास और उसके लोगों की भलाई के लिए अपनी प्रतिबद्धता पर ज़ोर दिया।