शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:51 IST

पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ३०० हून अधिकांचा मृत्यू झाला.

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. पहलगाम गहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. तर दुसरीकडे, आता भारताने पाकिस्तानला मदत केल्याची माहिती समोर आली आहे. 

काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे फील्ड मार्शल आर्मी चीफ असीम मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकीही दिली होती. एवढं सगळं होऊनही भारताने पाकिस्तानला खूप मदत केली. पाकिस्तानच्या अनेक भागात पूर आला आहे, यामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने तावी नदीतील पुराची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिली आहे. 

'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका

भारताने पाकिस्तानला पुराबद्दल इशारा दिला

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने तावी नदीत संभाव्य पुराबद्दल पाकिस्तानला इशारा दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे.

भारताने संभाव्य पुरांबद्दल माहिती देण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये संपर्क होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारत किंवा पाकिस्तानकडून या माहितीची दिलेली नाही.सहसा, अशी माहिती सिंधू जल आयुक्तांमार्फत दिली जाते. तावी नदी जम्मूहून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वाहते.

रविवारी भारताने पुराचा इशारा दिला होता

भारताने जम्मूमधील तावी नदीत मोठ्या पुराचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने रविवारी हा इशारा दिला.

भारताने सिंधू जल करार स्थगित केला 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर, २२ एप्रिल रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली. या काळात भारताने १९६० चा सिंधू जल करार देखील स्थगित केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत