रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:47 IST2025-09-11T12:46:38+5:302025-09-11T12:47:07+5:30
India Russia Relations : रशियात नोकरीचे आमिष दाखवून थेट सैन्यात भरती करून घेण्याचे फसवणुकीचे प्रकार सध्या सुरु आहेत

रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
India Russia Relations : परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत रशियन सैन्यात भरती होण्याची ऑफर स्वीकारू नये असा इशारा दिला आहे. अलिकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे भारतीयांनानोकरीचे खोटे आश्वासन देऊन रशियन सैन्यात बोलावण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दिल्ली आणि मॉस्को येथे रशियासोबत या विषयावर चर्चा झाली आहे. भारताने रशियन अधिकाऱ्यांना ही भरती ताबडतोब थांबवावी आणि आधी भरती केलेल्या भारतीयांना सोडून द्यावे, अशी विनंती केली आहे.
सरकारचे आवाहन
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पुन्हा एकदा सर्व भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात भरती होण्याच्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्याची विनंती करतो, कारण हे एक अतिशय धोकादायक पाऊल आहे. अनेक एजन्सी किंवा दलाल रशियामध्येनोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांना आकर्षित करत आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना थेट सैन्यात भरती केले जाते. सरकारने लोकांना अशा प्रलोभनांना बळी पडू नका आणि कोणत्याही संशयास्पद ऑफरची त्वरित तक्रार करा असे आवाहन केले आहे.
Our response to media queries on Indians recruited into the Russian army
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 11, 2025
🔗 https://t.co/i6WIbHOK51pic.twitter.com/xzQKGEfJgR
मोदी-पुतिन बैठकीत चर्चा
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बैठकीत बनावट भरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भारत सरकार या विषयावर रशियावर सतत दबाव आणत आहे, जेणेकरून कोणत्याही भारतीयाला युद्धासारख्या धोकादायक परिस्थितीत नोकरीच्या उद्देशाने त्या विभागात काम करण्यास भाग पाडले जाऊ नये किंवा तो नागरिक फसवले जाऊ नयेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरती प्रक्रियेमुळे प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांशी सरकार सतत संपर्कात आहे. अनेक लोकांनी त्यांच्या समस्या शेअर केल्या आहेत आणि भारतात त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.