शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आम्ही काय अर्थव्यवस्था बंद करुन टाकायची का? पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांवर भारताच्या उच्चायुक्तांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:05 IST

रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन होत असलेल्या टीकेला ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

Oil Trade: रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया-युक्रेन युद्धात भारताने कधीही कोणत्याही देशाला उघडपणे पाठिंबा दिला नाही. रशियाशी असलेल्या ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधांमुळे भारत त्यांच्या विरोधात गेला नाही. भारत हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याचे अजूनही रशियाशी व्यापारी संबंध आहेत. अमेरिकेसह पाश्चात्य देशांना यावर आक्षेप आहे. अशातच भारताकडूनही टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भारताचे युनायटेड किंग्डममधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी रशियाकडून भारताच्या तेल आयातीबाबत स्पष्ट शब्दात आपले मत मांडले. भू-राजकीय कारणांमुळे भारत आपली अर्थव्यवस्था बंद करू शकत नाही, असं विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं. भारत-रशिया संबंध आणि पाश्चात्य देशांकडून टीका होत असताना विक्रम दोराईस्वामी यांनी याबाबत भाष्य केलं. आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? असा सवाल विक्रम दोराईस्वामी यांनी केला.

"भारतावर प्रश्न उपस्थित करणारे अनेक युरोपीय देश स्वतः त्याच देशांकडून ऊर्जा आणि इतर संसाधने खरेदी करत आहेत ज्यांच्याकडून भारताला खरेदी करण्यापासून रोखले जात आहे. तुम्हाला हे थोडे विचित्र वाटत नाही का? भारताचे रशियाशी असलेले संबंध केवळ इंधनापुरते मर्यादित नाहीत. ते सुरक्षा, ऊर्जा आणि सहकार्य अशा अनेक पैलूंवर आधारित आहेत. एकेकाळी पाश्चात्य देश भारताला शस्त्रे विकत नव्हते आणि तिच शस्त्रे शेजाऱ्यांना देऊन आमच्याविरुद्ध वापरली जायची," असं  विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं.

"आज परिस्थिती अशी आहे की ज्या देशांकडून आपण तेल खरेदी करायचो ते आता ते इतरांना विकत आहेत आणि आपल्याला ऊर्जा बाजारातून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोणता पर्याय आहे? आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? अनेक देश त्यांच्या सोयीसाठी अशा देशांशी संबंध ठेवत आहेत जे भारतासाठी अडचणीचे कारण आहेत. आम्ही तुम्हाला एकनिष्ठ आहात का हे विचारतो का? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षाच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ही युद्धाची वेळ नाही," असंही दोराईस्वामी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Indiaभारतrussiaरशिया