शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काय अर्थव्यवस्था बंद करुन टाकायची का? पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांवर भारताच्या उच्चायुक्तांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:05 IST

रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन होत असलेल्या टीकेला ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

Oil Trade: रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया-युक्रेन युद्धात भारताने कधीही कोणत्याही देशाला उघडपणे पाठिंबा दिला नाही. रशियाशी असलेल्या ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधांमुळे भारत त्यांच्या विरोधात गेला नाही. भारत हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याचे अजूनही रशियाशी व्यापारी संबंध आहेत. अमेरिकेसह पाश्चात्य देशांना यावर आक्षेप आहे. अशातच भारताकडूनही टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भारताचे युनायटेड किंग्डममधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी रशियाकडून भारताच्या तेल आयातीबाबत स्पष्ट शब्दात आपले मत मांडले. भू-राजकीय कारणांमुळे भारत आपली अर्थव्यवस्था बंद करू शकत नाही, असं विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं. भारत-रशिया संबंध आणि पाश्चात्य देशांकडून टीका होत असताना विक्रम दोराईस्वामी यांनी याबाबत भाष्य केलं. आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? असा सवाल विक्रम दोराईस्वामी यांनी केला.

"भारतावर प्रश्न उपस्थित करणारे अनेक युरोपीय देश स्वतः त्याच देशांकडून ऊर्जा आणि इतर संसाधने खरेदी करत आहेत ज्यांच्याकडून भारताला खरेदी करण्यापासून रोखले जात आहे. तुम्हाला हे थोडे विचित्र वाटत नाही का? भारताचे रशियाशी असलेले संबंध केवळ इंधनापुरते मर्यादित नाहीत. ते सुरक्षा, ऊर्जा आणि सहकार्य अशा अनेक पैलूंवर आधारित आहेत. एकेकाळी पाश्चात्य देश भारताला शस्त्रे विकत नव्हते आणि तिच शस्त्रे शेजाऱ्यांना देऊन आमच्याविरुद्ध वापरली जायची," असं  विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं.

"आज परिस्थिती अशी आहे की ज्या देशांकडून आपण तेल खरेदी करायचो ते आता ते इतरांना विकत आहेत आणि आपल्याला ऊर्जा बाजारातून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोणता पर्याय आहे? आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायची का? अनेक देश त्यांच्या सोयीसाठी अशा देशांशी संबंध ठेवत आहेत जे भारतासाठी अडचणीचे कारण आहेत. आम्ही तुम्हाला एकनिष्ठ आहात का हे विचारतो का? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षाच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ही युद्धाची वेळ नाही," असंही दोराईस्वामी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Indiaभारतrussiaरशिया