शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भारत 6.42 कोटी एकर उजाड जमीन सुपिक बनवेल; मोदी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:53 PM

सरकारने शेतीमध्ये मायक्रो ईरिगेशन सारखे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कॉप-14 (कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज) सम्मेलनात सहभाग घेतला. हे सम्मेलन पर्यावरण संरक्षण, भूमि व्यवस्थापन आदी विषयांवर आधारित होते. यामध्ये 94 देशांच्या पर्यावरण मंत्र्यांसह जवळपास 190 देशांचे सहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

मोदी यांनी या संमेलनामध्ये आश्वस्त करताना पर्यावरण संरक्षणात भारत सर्व प्रकारची मदत करेल आणि योगदानही देईल असे सांगितले. समुद्रातील पातळी वाढ, अनियमित पाऊस आणि वादळांमुळे जमिनीची हानी होत आहे. जलवायू परिवर्तनाचा नकारात्मक परिणाम जमिनीवर होत आहे. माझ्या सरकारने शेतीमध्ये मायक्रो ईरिगेशन सारखे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम केले आहे. बायो-फर्टिलाइजर्सच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहोत. तसेच रासायनिक कीटकनाशकांचे उत्पादन कमी करण्यात येत आहे. 

2015 ते 2017 मध्ये भारतात 8 लाख हेक्टर वनक्षेत्र वाढले आहे. उजाड माळरानावर, प्लॅस्टिकच्या वापरावर आम्ही काम सुरू केले आहे. सिंगल यूज प्लास्टिक बंद करण्याचा संकल्प केला आहे. आता सर्व जगालाही हे प्लॅस्टिक बंद करावे लागेल, असे मोदी म्हणाले. येत्या 2030 पर्यंत भारतातील 6.42 कोटी एकर उजाड जमीन लागवडीखाली आणणार असल्याची मोठी घोषणा मोदी यांनी केली. 

भारताकडे अध्यक्षपददर दोन वर्षांनी होत असलेल्या या सम्मेलनामध्ये यूएनसीसीडीच्या अध्यक्षपदी भारताला संधी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2 सप्टेंबरला कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. हे संमेलन 13 सप्टेंबरपर्यंत चालेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरण