शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

'भारत गर्विष्ठ, डोकलाममधील रस्त्याचं बांधकाम सुरुच ठेवणार', चीनचा उद्दामपणा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 3:15 PM

भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीजिंग - भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताकडून यासंबंधी देण्यात येणारी प्रतिक्रिया विचित्र आहे असंही लेखात म्हटलं आहे. या लेखात भारताचा वेडा असा उल्लेख करण्यात आला असून, गर्विष्ठ असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने चुंबी खो-यात एका रस्त्याचं बांधकाम सुरु केलं असून, हा परिसर भारत आणि चीनमधील वादग्रस्त ठिकाणाहून फक्त 10 किमी अंतरावर आहे असे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर उत्तरादाखल हा लेख लिहिण्यात आला आहे. 

लेखात चीनने डोकलाममध्ये कोणतंही नवं बांधकाम सुरु केला नसल्याचा दावा केला आहे. मात्र याचं कारण वेगळं सांगण्यात आलं आहे. लेखानुसार, सध्या बांधकाम करण्यासाठी योग्य हवामान नाही. सोबतच, या क्षेत्रात बांधकाम करण्याचे पुर्ण अधिकार चीनकडे असल्याचा दावाही लेखातून करण्यात आला आहे. डोकलाम चीनचा भाग असून, चीन सरकारच्या नियंत्रणात आहे असा दावाही करण्यात आला आहे. 

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.

टॅग्स :DoklamडोकलामchinaचीनIndian Armyभारतीय जवान