शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:10 IST

India vs Pakistan in UN : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली.

India vs Pakistan in UN : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली. मानवी हक्कांवरील ढोंगीपणा आणि दहशतवादाला दीर्घकाळ पाठिंबा दिल्याबद्दल भारतानेपाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची 'बडबड' निरर्थक, दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकारांबद्दल आणि उल्लंघनाच्या मुद्द्यावरून शिकवू नये, असे म्हणत झोडपून काढले.

जिनेव्हा येथे झालेल्या UNHRC च्या ६०व्या सत्राच्या ३४व्या बैठकीत भारतीय राजकीय तज्ञ्ज मोहम्मद हुसेन म्हणाले की, पाकिस्तानसारखा देश इतरांना मानवी हक्कांबद्दल उपदेश करू इच्छितो हे भारताला अत्यंत हास्यास्पद आणि विडंबनात्मक वाटते. असला अपप्रचार पसरवण्यापेक्षा पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या छळाबाबत काहीतरी उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यायला हवे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाक लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २३ नागरिक ठार झाले. याचा थेट संदर्भ न देता, हुसेन यांनी आपला मुद्दा अधोरेखित केला. अल्पसंख्याकांना पाकिस्तानमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल आणि अंतर्गत मानवी हक्क आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरत असण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली.

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भारतीय राजदूत पेटल गहलोत म्हणाल्या, "आज सकाळी या मेळाव्यात, आम्ही पाकिस्तानी पंतप्रधानांचा हास्यास्पद दावा पाहिला. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचाच गौरव केला. दहशतवाद पसरवण्याची आणि निर्यात करण्याची दीर्घ परंपरा असलेल्या देशाला या संदर्भात अत्यंत हास्यास्पद विधाने करण्यास लाजही वाटत नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात सहभागी असल्याचे भासवूनही, त्यांनी दशकभर ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी अलीकडेच कबूल केले की ते दशकांपासून दहशतवादी छावण्या चालवत आहेत," अशा शब्दांत भारताने पाकिस्तानचा पर्दाफाश केला.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या छळाबाबत आंततराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त

भूराजकीय संशोधक जोश बोवेस म्हणाले, “२०२५च्या USCIRFच्या धार्मिक स्वातंत्र्य अहवालात असे म्हटले आहे की ईशनिंदेच्या आरोपाखाली ७०० हून अधिक लोक तुरुंगात आहेत. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ३०० टक्के अधिक आहे. बलूच नॅशनल मुव्हमेंटच्या मानवाधिकार संस्थेने २०२५च्या पहिल्या सहामाहीत ७८५ जबरदस्तीने बेपत्ता आणि १२१ हत्यांचे दस्तऐवजीकरण केले आहे. पश्तून नॅशनल जिर्गाने म्हटले आहे की २०२५ मध्ये ४,००० पश्तून अजूनही बेपत्ता आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : India Slams Pakistan at UN: No Lectures on Human Rights

Web Summary : India strongly criticized Pakistan at the UN for its human rights record and support for terrorism. India highlighted Pakistan's hypocrisy and internal challenges, condemning its false narratives. Concerns were raised about the treatment of minorities and the alarming number of enforced disappearances in Pakistan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघTerrorismदहशतवादIndiaभारतterroristदहशतवादी