शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
4
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
5
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
6
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
7
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
8
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
9
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
10
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
11
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
12
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
13
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
14
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
15
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
16
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
17
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
18
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
19
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
20
Panvel Municipal Election 2026: 65 टक्के मालमत्ता कर सवलत देणार, 'शेकाप-मविआ'चा बॉन्ड पेपरवर वादा
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:10 IST

India vs Pakistan in UN : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली.

India vs Pakistan in UN : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली. मानवी हक्कांवरील ढोंगीपणा आणि दहशतवादाला दीर्घकाळ पाठिंबा दिल्याबद्दल भारतानेपाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची 'बडबड' निरर्थक, दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकारांबद्दल आणि उल्लंघनाच्या मुद्द्यावरून शिकवू नये, असे म्हणत झोडपून काढले.

जिनेव्हा येथे झालेल्या UNHRC च्या ६०व्या सत्राच्या ३४व्या बैठकीत भारतीय राजकीय तज्ञ्ज मोहम्मद हुसेन म्हणाले की, पाकिस्तानसारखा देश इतरांना मानवी हक्कांबद्दल उपदेश करू इच्छितो हे भारताला अत्यंत हास्यास्पद आणि विडंबनात्मक वाटते. असला अपप्रचार पसरवण्यापेक्षा पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या छळाबाबत काहीतरी उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यायला हवे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाक लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २३ नागरिक ठार झाले. याचा थेट संदर्भ न देता, हुसेन यांनी आपला मुद्दा अधोरेखित केला. अल्पसंख्याकांना पाकिस्तानमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल आणि अंतर्गत मानवी हक्क आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरत असण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली.

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भारतीय राजदूत पेटल गहलोत म्हणाल्या, "आज सकाळी या मेळाव्यात, आम्ही पाकिस्तानी पंतप्रधानांचा हास्यास्पद दावा पाहिला. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचाच गौरव केला. दहशतवाद पसरवण्याची आणि निर्यात करण्याची दीर्घ परंपरा असलेल्या देशाला या संदर्भात अत्यंत हास्यास्पद विधाने करण्यास लाजही वाटत नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात सहभागी असल्याचे भासवूनही, त्यांनी दशकभर ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी अलीकडेच कबूल केले की ते दशकांपासून दहशतवादी छावण्या चालवत आहेत," अशा शब्दांत भारताने पाकिस्तानचा पर्दाफाश केला.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या छळाबाबत आंततराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त

भूराजकीय संशोधक जोश बोवेस म्हणाले, “२०२५च्या USCIRFच्या धार्मिक स्वातंत्र्य अहवालात असे म्हटले आहे की ईशनिंदेच्या आरोपाखाली ७०० हून अधिक लोक तुरुंगात आहेत. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ३०० टक्के अधिक आहे. बलूच नॅशनल मुव्हमेंटच्या मानवाधिकार संस्थेने २०२५च्या पहिल्या सहामाहीत ७८५ जबरदस्तीने बेपत्ता आणि १२१ हत्यांचे दस्तऐवजीकरण केले आहे. पश्तून नॅशनल जिर्गाने म्हटले आहे की २०२५ मध्ये ४,००० पश्तून अजूनही बेपत्ता आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : India Slams Pakistan at UN: No Lectures on Human Rights

Web Summary : India strongly criticized Pakistan at the UN for its human rights record and support for terrorism. India highlighted Pakistan's hypocrisy and internal challenges, condemning its false narratives. Concerns were raised about the treatment of minorities and the alarming number of enforced disappearances in Pakistan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघTerrorismदहशतवादIndiaभारतterroristदहशतवादी