शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:10 IST

Petal Gahlot And Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी 'राईट टू रिप्लाय' वापरून पाकिस्तानलादहशतवादावरून घेरलं. 

पेटल गहलोत म्हणाल्या की, "सकाळी पाकिस्तानी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दहशतवादाचं उदात्तीकरण केलं आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना "रेझिस्टन्स फ्रंट" चा बचाव केला, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार होती."

"ओसामा बिन लादेनला लपवून ठेवलं"

"हा तोच पाकिस्तान आहे ज्याने वर्षानुवर्षे ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, लपवून ठेवलं आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचं नाटक केलं. त्यांच्या मंत्र्यांनी स्वतः कबूल केलं आहे की, पाकिस्तान अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवत आहे.

"उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर..."

 पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. "पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या 'विजयाबद्दल' बोलत आहेत ते प्रत्यक्षात भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटो आहेत. जर पाकिस्तानला हा विजय वाटत असेल तर तो त्यांना वाटू द्या" असं म्हणत गहलोत यांनी सडेतोड उत्तर दिलं.

"दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार"

"सत्य हे आहे की, भारतातील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे आणि भारत नेहमीच आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल उचलेल. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील आणि यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही" असंही पेटल गहलोत यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India slams Pakistan at UN: 'Destroyed airbase your victory?'

Web Summary : India strongly responded to Pakistan's UN speech, accusing it of supporting terrorism. Patel Gehlot highlighted Pakistan's defense of terrorist groups and sheltering Osama bin Laden. India asserted its right to protect its citizens and resolve issues bilaterally.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ