शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानने आम्हाला त्यांच्या वादात ओडू नये, तालिबानी नेत्याचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:51 IST

Afghanistan Crisis: 'भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये.'

काबुल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडूनभारताला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तालिबान पाकिस्तान आणि इतर दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारताविरोधात कारवाया करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मतही स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, अशीही माहिती त्याने दिली. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाईवर परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी येऊ शकते.

'मीडियातील बातम्या चुकीच्या'तालिबान सरकारला भारताबद्दल पूर्ववैमनस्यपूर्ण शत्रुत्व असण्याची किंवा पाकिस्तानच्या संगनमतानं भारताला लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टनिकझाई म्हणाला की, प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. आम्ही अशाप्रकारचे विधान कधी केलंच नाही. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही तो म्हणाला.

भारताने त्यांचे प्रोजेक्ट पुर्ण करावेदरम्यान, यापूर्वीही तालिबानचा प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाला होता की, तालिबानला अफगाणिस्तानमधील भारताच्या विकास प्रकल्पाबाबत कधीच तक्रार नव्हती. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांत भारतानं केलेल्या विकासकामांवर - रस्त्यांपासून धरणं आणि अगदी संसदेच्या इमारतीपर्यंत तालिबान बंदी घालेल अशी भीती होती. पण, शाहीन म्हणाला की, अफगाणी लोकांच्या हिताशी संबंधित प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, आम्ही यात कुठला अडथळा आणणार नाही. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतPakistanपाकिस्तान