शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

भारत-पाकिस्तानने आम्हाला त्यांच्या वादात ओडू नये, तालिबानी नेत्याचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:51 IST

Afghanistan Crisis: 'भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये.'

काबुल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडूनभारताला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तालिबान पाकिस्तान आणि इतर दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारताविरोधात कारवाया करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मतही स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, अशीही माहिती त्याने दिली. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाईवर परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी येऊ शकते.

'मीडियातील बातम्या चुकीच्या'तालिबान सरकारला भारताबद्दल पूर्ववैमनस्यपूर्ण शत्रुत्व असण्याची किंवा पाकिस्तानच्या संगनमतानं भारताला लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टनिकझाई म्हणाला की, प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. आम्ही अशाप्रकारचे विधान कधी केलंच नाही. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही तो म्हणाला.

भारताने त्यांचे प्रोजेक्ट पुर्ण करावेदरम्यान, यापूर्वीही तालिबानचा प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाला होता की, तालिबानला अफगाणिस्तानमधील भारताच्या विकास प्रकल्पाबाबत कधीच तक्रार नव्हती. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांत भारतानं केलेल्या विकासकामांवर - रस्त्यांपासून धरणं आणि अगदी संसदेच्या इमारतीपर्यंत तालिबान बंदी घालेल अशी भीती होती. पण, शाहीन म्हणाला की, अफगाणी लोकांच्या हिताशी संबंधित प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, आम्ही यात कुठला अडथळा आणणार नाही. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतPakistanपाकिस्तान