शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:51 IST

India-Pakistan Meeting: फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे बैठक झाल्याचे वृत्त!

India-Pakistan Meeting: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असले तरी, अनौपचारिक स्तरावर, म्हणजेच ट्रॅक-2 (बॅक चॅनेल) चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे भारत आणि पाकिस्तानी प्रतिनिधींमध्ये एक अनौपचारिक बैठक झाल्याचे वृत्त आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोन देशांमधील अधिकृत संबंध तुटतात किंवा संवाद थांबतो, तेव्हा अशा अनौपचारिक बैठका परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यासाठी आणि संवादाचे मार्ग खुले ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. या बैठका अनौपचारिक असल्यामुळे त्यानंतर कोणतेही संयुक्त निवेदन जारी केले जात नाही किंवा कोणताही देश अधिकृतपणे अशा बैठकींची पुष्टी किंवा खंडन करत नाही.

ट्रॅक-2 (बॅक चॅनेल) चर्चा म्हणजे काय?

ट्रॅक-2 कूटनीती म्हणजे सरकारचे अधिकृत प्रतिनिधी नसलेले माजी अधिकारी, पत्रकार, व्यावसायिक नेते, धोरणतज्ज्ञ आणि नागरी समाजातील प्रतिनिधी यांच्यात होणारी अनौपचारिक चर्चा. या चर्चेचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण करणे, नवीन कल्पना आणि उपायांची चाचणी करणे, अधिकृत चर्चेसाठी वातावरण तयार करणे आणि तणाव कमी करण्यासाठी संवाद चालू ठेवणे हा असतो. याउलट ट्रॅक-1 ही अधिकृत सरकार-ते-सरकार चर्चा असते.

ट्रॅक-1.5 कूटनीती काय असते?

जेव्हा देशांमधील संबंध खूप तणावपूर्ण असतात, तेव्हा ट्रॅक-1.5 कूटनीती वापरली जाते. यात सरकारी अधिकारी अनौपचारिकरित्या बाहेरील तज्ज्ञ, संस्था किंवा प्रतिनिधींशी चर्चा करतात. 1993 च्या ओस्लो कराराच्या सुरुवातीच्या टप्प्यात नॉर्वेमध्ये इस्रायली शिक्षणतज्ज्ञ आणि पीएलओ प्रतिनिधींमध्ये अशाच अनौपचारिक बैठका झाल्या होत्या. भारतानेही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये पडद्यामागील कूटनीतीचा वापर केला आहे.

भारत-चीन संबंध सुधारण्यात ट्रॅक-2 ची भूमिका

2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील अधिकृत संपर्क कमी झाले होते. मात्र, ट्रॅक-2 संवाद सुरूच राहिला. याच संवादामुळे 2025 मध्ये तियानजिन येथे एससीओ परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. पुढे 5 वर्षांनंतर ऑक्टोबर 2025 मध्ये दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाली. व्यापार आणि लोकसंपर्कही हळूहळू पुन्हा सुरू झाले. 

निज्जर प्रकरणानंतर भारत-कॅनडा संबंध बिघडलेले...

हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणानंतर भारत आणि कॅनडा यांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. मात्र, ट्रॅक-1.5 कूटनीतीनंतर दोन्ही देशांनी व्यावहारिक भूमिका घेतली. यानंतर जून 2025 मध्ये G7 परिषदेत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट आणि नोव्हेंबर 2025 मध्ये G20 परिषदेत चर्चा झाली. त्यानंतर 2026 च्या सुरुवातीला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यात काही ठोस निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुधारले. त्यामुळेच ट्रॅक-2 आणि ट्रॅक-1.5 कूटनीती ही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan backchannel talks ongoing amidst tensions; Doha meeting revealed.

Web Summary : Despite tensions, India and Pakistan engaged in 'Track-2' talks in Doha, aiming to maintain communication. These informal discussions, involving non-government figures, foster trust and explore solutions when official channels are strained, easing tensions and paving way for formal dialogues.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान