शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:22 IST

India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे.

India-Pakistan Conflict:  मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे आता  बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान पाठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी भारताकडून दिल्लीत बलुचिस्तानसाठी दूतावासाची मागणीही केली आहे.

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

पोस्टमध्ये काय आहे?

मीर यार बलोच यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो."

UN मध्ये मान्यतेची मागणी केली

मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि या मान्यतेला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी डॉलर्स सोडले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

मीर यार बलोच यांनी पुढे लिहिले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान बलुचिस्तानमध्ये पाठवण्याची आणि पाकिस्तानी कब्जा करणाऱ्या सैन्याला बलुचिस्तानचे क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगण्याची आणि बलुचिस्तानमधील सर्व शस्त्रे आणि मालमत्ता सोडण्यास सांगण्याची विनंती करतो.

बलुचिस्तानबाहेरच्यांनी तात्काळ बलुचिस्तान सोडावे

"सेना, फ्रंटियर कॉर्प्स, पोलिस, मिलिटरी इंटेलिजेंस, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलुचिस्तान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन अंतरिम सरकारची घोषणा केली जाईल", असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत