शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:22 IST

India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे.

India-Pakistan Conflict:  मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे आता  बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान पाठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी भारताकडून दिल्लीत बलुचिस्तानसाठी दूतावासाची मागणीही केली आहे.

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

पोस्टमध्ये काय आहे?

मीर यार बलोच यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो."

UN मध्ये मान्यतेची मागणी केली

मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि या मान्यतेला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी डॉलर्स सोडले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

मीर यार बलोच यांनी पुढे लिहिले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान बलुचिस्तानमध्ये पाठवण्याची आणि पाकिस्तानी कब्जा करणाऱ्या सैन्याला बलुचिस्तानचे क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगण्याची आणि बलुचिस्तानमधील सर्व शस्त्रे आणि मालमत्ता सोडण्यास सांगण्याची विनंती करतो.

बलुचिस्तानबाहेरच्यांनी तात्काळ बलुचिस्तान सोडावे

"सेना, फ्रंटियर कॉर्प्स, पोलिस, मिलिटरी इंटेलिजेंस, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलुचिस्तान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन अंतरिम सरकारची घोषणा केली जाईल", असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत