शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:22 IST

India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे.

India-Pakistan Conflict:  मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे आता  बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान पाठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी भारताकडून दिल्लीत बलुचिस्तानसाठी दूतावासाची मागणीही केली आहे.

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

पोस्टमध्ये काय आहे?

मीर यार बलोच यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो."

UN मध्ये मान्यतेची मागणी केली

मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि या मान्यतेला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी डॉलर्स सोडले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

मीर यार बलोच यांनी पुढे लिहिले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान बलुचिस्तानमध्ये पाठवण्याची आणि पाकिस्तानी कब्जा करणाऱ्या सैन्याला बलुचिस्तानचे क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगण्याची आणि बलुचिस्तानमधील सर्व शस्त्रे आणि मालमत्ता सोडण्यास सांगण्याची विनंती करतो.

बलुचिस्तानबाहेरच्यांनी तात्काळ बलुचिस्तान सोडावे

"सेना, फ्रंटियर कॉर्प्स, पोलिस, मिलिटरी इंटेलिजेंस, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलुचिस्तान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन अंतरिम सरकारची घोषणा केली जाईल", असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत