शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 23:24 IST

इस्लामिक विद्वानांसोबत झालेल्या बैठकीवेळी मोहसीन नक्वी यांच्यासोबत अंतर्गत व्यवहार राज्यमंत्री तलाल चौधरी, रुअत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कबीर आझाद आदी उपस्थित होते.

भारतानेपाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई करून जवळपास दोन महिने झाली आहेत. मात्र अद्यापही पाकिस्तानचे घाव भरलेले दिसत नाहीत. आता पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री मोहसीन नक्वी यांनी पाक एअरबेसवरील हल्ल्यासंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत मे महिन्यात पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली होती. त्यावेळी तेथे एअरक्राफ्ट उभे होते आणि पाकिस्तानी हवाई दलाचे सैनिकही उपस्थित होते.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांनी गुरुवारी (३ जुलै २०२५) मोहरमच्या दिवशी इस्लामिक धर्मगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा खुलासा केला आणि भारताने पाकिस्तानी एअरबेसवर ११ क्षेपणास्त्रे डागली, मात्र एअरबेसचे काहीही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सतत्याने आपल्या शौर्याच्या खोट्या गप्पा मारत आला आहे. मोहसिन नक्वीही इस्लामिक  विद्वानांसमोर हेच करत आहेत.

आसिम मुनीर यांच्यासंदर्भात काय म्हणाले मोहसिन नक्वी? -मोठ मोठ्या गप्पा मारत मोहसिन नक्वी म्हणाले, "पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या शौर्याने लढा दिला. जेव्हा भारतासोबत युद्ध झाले, तेव्हा अल्लाहतालाने आपल्याला मदत केली. तसेच त्यावेळी लष्कर प्रमुखही खंबीरपणे उभे होते. त्यांना कसलीही अडचण नव्हती. तसेच, त्यांनी हल्ला केला, तर त्यांना चारपट भोगावे लागेल, याची स्पष्टता होती." दरम्यान, भारतीय नागरिकांना नुकसान पोहोचवण्याची अथवा तणाव वाढवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

इस्लामिक विद्वानांसोबत झालेल्या बैठकीवेळी मोहसीन नक्वी यांच्यासोबत अंतर्गत व्यवहार राज्यमंत्री तलाल चौधरी, रुअत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कबीर आझाद आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत