शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:11 IST

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले.

'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पण, पाकिस्तानने आज पर्यंत हे मान्य केले नव्हते. दरम्यान, आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या खोट्या आरोपांवर मोठा खुलासा केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या हवाई दलाच्या तळांवर आणि दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे त्यांनी कबुल केले. यामुळे आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. 

महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...

सेठी यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या लष्करी ताकदीचा हा एक मोठा पुरावा मानला जात आहे. वरिष्ठ राजकीय विश्लेषक आणि पंजाब प्रांताचे माजी काळजीवाहू मुख्यमंत्री नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी समा टीव्हीशी बोलताना सांगितले की, यावेळी भारताने आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे आणि अचूकतेचे प्रदर्शन केले आणि थेट पाकिस्तानच्या हवाई तळावर आणि तथाकथित "स्वातंत्र्य सैनिकांच्या" कार्यालयांना लक्ष्य केले. "भारताने दाखवून दिले आहे की त्यांची क्षेपणास्त्रे हवेतून सोडली गेली किंवा जमिनीवरून, ती त्यांचे लक्ष्य अचूकपणे गाठू शकतात. जर त्यांनी अजूनही आमच्या हवाई तळावर, जिथे विमाने उभी आहेत, लक्ष्य केले तर नुकसान खूप गंभीर असू शकते, असंही त्यांनी म्हटले.

पाकिस्तानचे मोठे नुकसान 

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० मे दरम्यान झालेल्या भारताच्या लष्करी ऑपरेशन "ऑपरेशन सिंदूर" मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. अनेक हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि दहशतवाद्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तान सरकार कोणतेही मोठे नुकसान झाले नाही असा दावा करत राहिले. अलीकडेच, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान किमान ६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली.

पाकिस्तानात संरक्षण यंत्रणेचा अभाव

पाकिस्तानकडे भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी एस-४०० ट्रायम्फ किंवा आयर्न डोम सारखी कोणतीही संरक्षण प्रणाली नाही, अशी कबुलीच त्यांनी दिली. "आम्हाला आमच्या कमकुवतपणा दिसल्या. सध्या आमच्याकडे भारतीय क्षेपणास्त्रांपासून बचाव करू शकेल अशी कोणतीही संरक्षण प्रणाली नाही," असे ते म्हणाले. भारताकडे रशियन बनावटीची एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर