शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

India China FaceOff: गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 09:53 IST

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते

ठळक मुद्देअमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल्या न्यूजवीकने आपल्या नव्या अंकात याबाबत केला गौप्यस्फोटचीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानुसारच लडाखमध्ये चिनी सैन्याने केली घुसखोरीचीनच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनच्या नेतृत्वाला बसला धक्का

वॉशिंग्टन - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आलेले असल्याने कमालीचे स्फोटक बनलेले आहे. त्यातच पँगाँग सरोवराच्या परिसरातील उंचावरील ठिकाणांवर भारतील लष्करारे कब्जा केल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याची कोंडी झाली आहे. त्यातच आता गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनवर ओढवलेल्या नामुष्कीबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. या संघर्षात भारताच्याही २० जवानांना वीरमरण आले होते.अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल्या न्यूजवीकने आपल्या नव्या अंकात याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानुसारच लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. गलवानमध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या चकमकीत चीनचे ६० सैनिक मागले गेल्याचे न्यूजवीकने म्हटले आहे.भारताकडून मिळालेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनची कपट चाल अयशस्वी झाली आहे. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आता भविष्यात देशामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानापासून मार्ग काढण्यासाठी पळवाट शोधत आहेत. सध्या चीनमधील कम्युनिस्ट पक्ष स्थित्यंतरामधून जात आहे. अशा परिस्थितीत जिनपिंग यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याला आलेले अपयश पक्षांतर्गत घडामोडींमध्ये जिनपिंग यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर पीएलएने घुसखोरी करून तळ ठोकला होता. मात्र भारतीय लष्कराने त्याला प्रत्युत्तर देताना जवळच्या पर्वतीय भागांवर कब्जा केला आहे.भारताची चाल ठरली निर्णायक : फौजांनी केली महिनाभरापासून नियोजनबद्ध तयारीलड्डाख सीमेवरील चीनच्या आक्रमक विस्तारवादाला शह देण्यासाठी भारतीय फौजांनी तब्बल महिनाभरापासून तयारी केली होती. अतिशय नियोजनबद्ध केलेल्या या कारवाईमध्ये पँगाँग तलावाजवळील सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या शिखरांवर भारतीय फौजांनी ताबा मिळवला. भारताच्या या मुसंडीने चीनही हबकला. हटवादी चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरणार आहे, हे गृहीत धरूनच भारताने ही चाल केली होती. ती निर्णायक ठरली.चीनच्या विस्तारवादाला शह देण्यासाठी भारताने २९-३० ऑगस्टला पँगाँग सरोवराच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या डोंगरांवर ताबा मिळवला. या कारवाईमुळे रेझान्ग लापर्यंत चिनी फौजांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबर त्यांना भारतीय तोफांच्या माऱ्याखाली आणणे शक्य झाले. भारतीय फौजांची चाल चीनविरोधात निर्णायक ठरली. यामुळे चिनी फौजा खऱ्या अर्थाने माघारी फिरल्या. भारतीय सेनेने चीनच्या विरोधात या कारवाईला प्रतिबंधात्मक कारवाई संबोधले.३० जूनला झालेल्या ध्वज बैठकीत सैन्य माघारी घेण्यासंदर्भात चीनने होकार दर्शवला होता. मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही फौजा मागे घेतल्या नाहीत. या कारवाईची माहिती मोजक्याच अधिकाऱ्यांना होती. कारवाईसाठी अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. यात इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, स्पेशल फ्रंटिअर फोर्स आणि भारतीय लष्कर, असे पर्याय ठेवण्यात आले होते. शेवटी स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले. या कारवाईमुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप तसेच मॉल्डो येथील शिखरांवर ताबा मिळवता आला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Army Dayभारतीय सैन्य दिनchinaचीनIndiaभारत