शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बांगलादेश मैत्रिला जागला, भारताला थेट स्वत:चं बंदर वापरण्याची दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:11 PM

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी नुकतीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्यावर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. तसंच भारताच्या पूर्वेकडील राज्यांना संपर्क वाढवण्याचा दृष्टीनं चटगांव बंदराचा वापर करता येईल, असंही त्या म्हणाल्या.

“जर संपर्क वाढवला जात असेल तर आसाम आणि त्रिपुरा सारख्या भारतातील पूर्वेकडील राज्यांना चटगांव बंदराचा वापर करता येईल,” असं शेख हसीना यांनी कथितरित्या एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं. ढाका ट्रिब्यूननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एस. जयशंकर यांनी गुरुवारी शेख हसीना यांची भेट घेतली.

चटगांव बंदर हे बांगलादेशमधील मुख्य बंदर आहे. जयशंकर आणि शेख हसीना यांच्या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे शेख हसीना यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं. “दोन्ही देशांना फायद्यासाठी संपर्क वाढवण्याची गरज आहे. बागलादेशच्या दक्षिणपूर्व चटगांव बंदराचा उपयोग केल्यानं भारतच्या पूर्वोत्तर क्षेत्राला विशेष रुपानं फायदा होईल,” अशी बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांचे प्रेस सचिव एहसानुल करीम यांनी दिली. भारत आणि बांगलादेशदरम्यान सीमापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर ते बंद करण्यात आले होते, असा उल्लेखही शेख हसीना यांनी केला. यादरम्यान द्वीपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे करीम म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना त्यांच्या सोयीनुसार भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. बैठकीदरम्यान द्विपक्षीय संबंधांशिवाय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली,” असं जयशंकर यांनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकर