शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारत गर्विष्ठ, नकारात्मक; शांती प्रस्तावावर प्रतिक्रिया न दिल्याने इम्रान खानचा तोल सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भलतेच संतापले आहेत. त्यांनी भारताला गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.

इम्रान खानने म्हटले आहे की, दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. भारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो आहे. मी आपल्या आयुष्यात अशा छोट्या लोकांना भेटलोय जे कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले आहेत. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे.

इम्रान खानने पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहिले होते. यामध्ये शांतता चर्चा आणि संयुक्त राष्ट्राच्या बैठकीच्या आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाली नाही. या काळात सीमेपलीकडून झालेले दहशतवादी हल्ले, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबनेवरून भारताने पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानIndiaभारतTwitterट्विटर