शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानशी व्यावहारिक संवाद गरजेचा; भारताचे संयुक्त राष्ट्रांना आवाहन, पाकिस्तानवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:01 IST

भारताने लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, ISIS, अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांवर कडक कारवाईची मागणी करावी.

न्यूयॉर्क : अफगानिस्तानातील जनतेचे जीवन सुकर करण्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तालिबानसोबतचे व्यावहारिक संबंध सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथनेनी हरीश यांनी स्पष्ट केले की, भारत तालिबानशी व्यावहारिक सहभागाचे आवाहन करतो. फक्त कारवाई केंद्रित दृष्टिकोन योग्य नाही. सातत्यपूर्ण धोरणाने सकारात्मक पावले उचलण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. 

अफगाणी जनतेच्या विकासात्मक गरजा पूर्ण करणे, ही आपली बांधिलकी आहे. काबुलमधील भारतीय टेक्निकल मिशनचे दूतावासात पुनःस्थापन करण्याचा निर्णय ही त्याच वचनबद्धतेचे प्रमाण आहे. अफगाणिस्तानच्या जनतेचा प्राधान्यक्रम आणि आकांक्षांच्या अनुषंगाने सर्वांगीण विकास, मानवतावादी मदत आणि क्षमता बांधणीमध्ये आपले योगदान वाढविण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांशी संपर्क साधत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारत-अफगाणिस्थानचे वाढते संबंध...

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी ऑक्टोबरमध्ये सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर ते भारताला भेट देणारे सर्वात वरिष्ठ आणि बहुदा पहिलेच तालिबानी मंत्री होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी व्यापक चर्चा केली आणि काबूलमधील तांत्रिक मिशनचे दूतावासात रुपांतर करण्याची आणि अफगाणिस्तानमधील विकासकाम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा

राजदूत हरीश यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्याच्याकडून चालू असलेल्या दहशतवादी पोसणाऱ्या धोरणांवर टीका केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, तसेच ISIS, अल-कायदा यांसारख्या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या सर्व दहशतवादी संघटनांच्या क्रियाकलापांवर कडक कारवाई करावी.

पाकिस्तानी हवाई हल्ल्यांवर भारताची तीव्र निंदा

भारताने UNAMAने व्यक्त केलेल्या चिंतेचे समर्थन करत, पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्यांना तीव्र शब्दांत विरोध केला. या हल्ल्यांत महिला, मुले आणि खेळाडूंचा मृत्यू झाल्याचे सांगत हरीश म्हणाले की, देशाच्या व्यापार मार्गांना अडथळा आणणे, हा WTO नियमांचा भंग आहे आणि अशा कृती संयुक्त राष्ट्र चार्टर व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहेत. भारताने अफगानिस्तानच्या भौगोलिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे समर्थन पुन्हा स्पष्ट केले.

अफगाणिस्तानात भारताचे 500 हून अधिक विकास प्रकल्प

भारताने आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, क्षमता निर्माण आणि क्रीडा क्षेत्रात अफगाणिस्तानात 500 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केले आहेत. अफगाणी उद्योग-वाणिज्य मंत्री नूरुद्दीन अज़िजी यांच्या अलीकडील भारत दौर्‍यामुळे व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि बाजार प्रवेशात सहकार्य आणखी वाढल्याचे भारताने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Urges Taliban Dialogue at UN, Criticizes Pakistan's Terror Policies

Web Summary : India advocates practical Taliban engagement at the UN, emphasizing Afghan development and reopening its Kabul mission. Indirectly criticizing Pakistan, India condemned support for terrorist groups and airstrikes in Afghanistan, reaffirming its commitment to Afghan sovereignty and development projects.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद