शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रशियाचे उपकार फेडणार तरी कसे? द्वेष्ट्या अमेरिकेची चिडचिड, तरी भारतानं पुन्हा मारली दांडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:21 IST

UN Human Rights Council Voting: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी रशियाविरोधातील निंदा प्रस्तावावर भारतानं पुन्हा एकदा सावध भूमिका घेतली आहे.

UN Human Rights Council Voting: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी रशियाविरोधातील निंदा प्रस्तावावर भारतानं पुन्हा एकदा सावध भूमिका घेतली आहे. युकेनमध्ये रशियानं सैन्य कारवाई करत मानवाधिकार कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रशियाविरोधीतील प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. या प्रस्तावाला ३२ सदस्य देशांना पाठिंबा दिला. पण भारतासह एकूण १३ जणांनी या मतदानात सहभागच घेतला नाही. तर दोन जणांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. रशियाविरोधातील प्रस्तावासोबतच मानवाधिकार कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापन करण्याबाबतही एकमत या बैठकीत झालं. 

युक्रेनवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांकडून विविध मार्गांनी रशियावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशियाविरोधात विविध प्रस्ताव आणले जात आहे. यात सुरक्षा परिषद आणि महासभेचा देखीस समावेश आहे. पण भारतानं यावरील कोणत्याही प्रस्तावावेळी मतदानात सहभाग घेतला नाही. संपूर्ण प्रकरणात भारतानं तटस्थ राहणं पसंत केलं आहे. 

जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्रातील युक्रेनचे राजदूत येवेनिया फिलिपेंको मतदान होण्याच्या काही मिनिटं आधी म्हणाले की, रशियानं केलेल्या गुन्ह्यांची नोंद आणि तपासणी करुन जबाबदारी निश्चित करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे"

रशियानं युक्रेनियन नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. रशियाविरोधातील प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी आणि युक्रेनमधील घटनांना आम्हाला दोष देण्यासाठी काही लोक कोणत्याही साधनांचा उपयोग करण्यासाठी तयार आहेत, असं रशियाचे प्रतिनिधी एवगेनी उस्तीनोव यांनी परिषदेत म्हटलं. 

यूएनच्या मानवाधिकार परिषेदत रशियाविरोधातील प्रस्तावाला रशिया आणि इरिट्रिया या दोनच सदस्यांनी विरोध केला. चीननंही यावेळी मतदानात सहभाग घेतला नाही. या मु्द्द्यावर तात्काळ दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग सोडवावा असं अनेकांनी म्हटलं. दरम्यान, अनेक देशांनी रशियाचा उघड विरोध केला. एकूण ३२ सदस्यांनी रशियाविरोधात मतदान करुन प्रस्तावाला मान्यता दिली. गाम्बिया आणि मलेशिया सारख्या छोट्या देशांनीही रशियाविरोधात यावेळी आवाज उठवला. 

भारतानं बुधवारी देखील सुरक्षा परिषदेत रशियाविरोधातील प्रस्तावात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सुरक्षा परिदेत १४१ देशांनी रशियाविरोधात आणलेल्या निंदा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं, तर पाच देशांनी विरोधात मतदान केलं होतं. त्याच वेळी, एकूण ३५ देशांनी तटस्थ राहून मतदानात भाग घेतला नाही, ज्यात भारताचा समावेश होता. यामुळे अमेरिकेनं चिडचिड व्यक्त केली होती आणि भारतावर देखील निर्बंध लादण्यात यावेत अशा विषयांवर चर्चा सुरू झाली होती.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धunited nationsसंयुक्त राष्ट्र संघrussiaरशियाIndiaभारत