शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 11:53 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे.

ठळक मुद्देकेवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्यइम्रान खान यांनी केले स्पष्टअनुच्छेद ३७० चा निर्णय रद्द करावा - इम्रान खान

इस्लामाबाद: जगभरात कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील कोरोनाबाधितांशी संख्या वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. देशात बिकट आणि गंभीर परिस्थिती असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवर भाष्य करत हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे. परंतु, त्यासाठी केवळ एकच अट असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. (imran khan says pakistan would not talk with india until kashmir decision revoked)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमादरम्यान काश्मीरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नी पुन्हा गरळ ओकण्याचे काम केल्याचे समजते. आता केवळ या एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. 

निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

अनुच्छेद ३७० चा निर्णय रद्द करावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० आणि ३५ए हटवण्यात आले. यामुळे काश्मीरचा विशेष दर्जा नाहीसा झाला. भारत सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेऊन काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा सुरू करणे शक्य नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा

सोशल मीडियावर कुरैशी यांनी व्हिडीओ शेअर करत आपल्याला कलम ३७० हटवल्याने कोणतीही अडचण नाही असे म्हटले होते. कलम ३७० पाकिस्तानसाठी महत्त्वाचे नाही. तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानला ३५ ए कलम हटवण्यावर आक्षेप आहे. यामुळे भारत आपल्या भौगोलिक रचनेत बदल करू शकेल, असे कुरैशी म्हणाले होते. मात्र, यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. 

दरम्यान, मी स्पष्ट करू इच्छितो की, जम्मू काश्मीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यात आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्दा मानला गेला आहे. यावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमत चाचणी घेतली जाईल. जम्मू काश्मीरशी निगडीत कोणताही मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असूच शकत नाही, असे म्हणत कुरैशी यांनी टीकेनंतर सारवासारव केली.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370Indiaभारत