शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाकिस्तानचं दिवाळं; एअर स्ट्राइकमुळे गुंतवणूकदार घाबरला, 'बाजार उठला'! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 6:03 PM

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी पाकिस्तानमधील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. आज बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक केएसई-100 काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला.   पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने सीमा पार करून एअर सर्जिकल स्ट्राइक करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, भारताकडून अजून हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानमधील शेअर बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक   काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली आहे. अशा परिस्थितीत भारतासोबतचा तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरगुंडी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत कराची शेअर बाजारात दोन हजार अंकांची घसरण झाली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानी शेअर बाजाराचे 6 टक्के नुकसान झाले आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर कराची शेअर बाजारात अजून मोठी घसरण होऊ शकते असे, अर्थतज्ज्ञांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानStock Marketशेअर बाजारIndiaभारतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक