शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चिनी रंगभूमीवर हिंदी मातीचा महाल

By admin | Updated: May 18, 2017 18:48 IST

आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला.

ऑनलाइन लोकमत
शांघाय, दि. 18 - आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला. कारण चीनच्या शांघाय येथे महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश( 1925-1972) यांच्या "आषाढ़ का एक दिन" या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर करण्यात आला. आधुनिक शांघायच्या इतिहासात  एखाद्या हिंदी नाटकाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ होती. 
 
शांघायसारख्या व्यस्त शहरात "आषाढ़ का एक दिन" या नाटकाच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक वर्षांपासून आपली माती, आपल्या भाषेपासून दूर राहूनही हिंदी रंगभूमीवर प्रेम करणा-यांची  संख्या कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. शांघायमधल्या यशानंतर आता बिजिंग आणि ग्वॉगजौ या शहरांतूनही नाटकाचं आयोजन करण्याचा आग्रह धरला जात आहे. 
 
हिंदी भाषा माहीत नसलेले दर्शक ज्यांनी कधीच रंगभूमीसाठी काम केलेलं नाही अशा कलाकारांसह काम करण्याचा निर्णय आव्हानात्मक होता असं नाटकाचे  दिग्दर्शक आणि कालिदासाची भूमिका करणारे मुकेश शर्मा म्हणाले. नाटकाची तयारी करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता कारण टीममधील अनेक सदस्य वेगवेगळ्या खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यामुळे स्काइपवर नाटकाची तयारी करावी लागत असे. पण कलाकारांनी 5 महिने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे नाटक यशस्वी ठरलं असं ते म्हणाले. 
 
महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित या नाटकात कालिदास यांची प्रेयसी मल्लिका हिच्या भूमिकेत  प्रियंका जोशी, मातुलच्या भूमिकेत अमित वायकर कालिदासांचा स्वयंघोषीत मित्र आर्य विलोम याच्या भूमिकेत अमित मेघणे, मल्लिकाची आई अंबिका हिच्या भूमिकेत धनश्री आणि राज वधूच्या भूमिकेत अपर्णा वायकर आदींनी आपल्या अफलातून अदाकारीने केवळ प्रेक्षकांना 2 तास थांबवून ठेवलं नाही तर त्यांना मंत्रमुग्ध केलं.   
 
विशेष म्हणजे स्त्रीप्रधान असलेल्या या नाटकाची सर्व जबाबदारी ही महिलांच्याच खांद्यावर होती. बीना वाघेला यांचा यामध्ये मोठा वाटा होता. हिंदी समजत नसलेल्या दर्शकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याचं काम हे आव्हानात्मक होतं पण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झालं असं त्या म्हणाल्या. 
 
यावेळी शांघायमधील भारताचे कॉन्सल जनरल प्रकाश गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक वर्षांपूर्वी हे काव्य वाचलं होतं पण शांघायमध्ये प्रत्यक्ष हे नाटक पाहून खरंच खूप आनंद झाला असं म्हणत त्यांनी सर्व कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतूक केलं. 
 
शांघाय रंगमंचाचे अकादमीचे उपाध्यक्ष "यूउ" यांची उपस्थितीही यावेळी लक्षणीय होती. त्यांनीही कलाकारांचं कौतूक केलं तसंच भविष्यात चीनी भाषेत हिंदी नाटकं व्हायला हवीत अशी इच्छा व्यक्त केली.  
 
आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या हिंदी रंगभूमीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.