शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 09:28 IST

golden visa uae : यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे.

Golden Visa UAE Process :  संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. या नव्या योजनेत गुंतवणुकीची किंवा व्यवसायाची गरज नाही, फक्त नामांकनावर आधारित प्रणालीद्वारे हा व्हिसा मिळू शकतो.

याआधी गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी दुबईमध्ये एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणं किंवा सुमारे ४.६६ कोटी रुपये (२० लाख दिराम) किमतीची मालमत्ता खरेदी करणं आवश्यक होतं. पण आता नवीन योजनेत फक्त १ लाख दिराम (२३.३० लाख रुपये) शुल्क भरून गोल्डन व्हिसासाठी अर्ज करता येईल.

सध्या चाचणी म्हणून सुरुवात!ही योजना सध्या चाचणी पातळीवर भारत आणि बांगलादेशात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांत ५ हजारांपेक्षा अधिक भारतीय अर्ज करणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रियेची जबाबदारी ‘रयाद ग्रुप’ नावाच्या कन्सल्टन्सी कंपनीकडे दिली गेली आहे.

रयाद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रयाद कमाल अयूब यांनी ही योजना भारतीयांसाठी एक ‘गोल्डन संधी’ असल्याचं म्हटलं आहे. यानंतर ही योजना CEPA (Comprehensive Economic Partnership Agreement) देशांमध्येही राबवली जाईल.

 कशी असेल अर्जाची प्रक्रिया?या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, ज्यात मनी लॉन्ड्रिंग आणि गुन्हेगारी इतिहासाची तपासणी असेल. याशिवाय अर्जदाराच्या सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जाईल. हा व्हिसा देताना अर्जदार यूएईच्या उद्योग, संस्कृती, विज्ञान, स्टार्टअप, व्यवसाय, किंवा इतर क्षेत्रांना कसा फायदा होईल, हेही पाहिलं जाईल. चाचणी पूर्ण झाल्यावर रयाद ग्रुप सरकारकडे शिफारस करेल, आणि सरकार अंतिम निर्णय घेईल.

कुठे करता येईल अर्ज?> भारत आणि बांगलादेशातील वन वास्को सेंटर

> रयाद ग्रुपचे नोंदणीकृत कार्यालय

> ऑनलाइन पोर्टल

> किंवा कॉल सेंटर यांच्यामार्फत अर्ज करता येईल.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला दुबईला प्रत्यक्ष जावं लागेल.

योजनेचे फायदे काय?या नव्या व्हिसाची खासियत म्हणजे तो संपत्तीवर आधारित नसल्यामुळे मालमत्ता विकली किंवा विभागली गेली, तरी व्हिसा रद्द होणार नाही. एकदा मिळालेला नामांकनाधारित व्हिसा कायमस्वरूपी असतो. याशिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत आणता येईल, घरगडी किंवा ड्रायव्हर ठेवता येतील, आणि ते स्वतः व्यवसाय किंवा व्यावसायिक कामही करू शकतील. ही योजना भारतातून यूएईमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या अनेक लोकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीVisaव्हिसाDubaiदुबईIndiaभारत