शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 9:14 AM

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे.

नवी दिल्ली - भारत आणि इराण या दोन्ही देशांत घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. अमेरिकेनं इराणवर काही निर्बंध लागले असून देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, इराण काहीसा अलिप्त पडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा इराणने सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्ण संबंधासह पर्यटन विकासालाही चालना देण्याचं इराणकडून होत आहे. त्यासाठी, देशाने काही ठोस पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय नागरिकांना इराणमध्ये जाण्यासाठी आता व्हिसा आवश्यक असणार नाही.

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. या यादीत रशिया, सौदी अरब, कतार, जपान आणि युएईसह एकूण ३२ देशांची नावे आहेत. इराणमधील अधिकृत न्यूज एजन्सी IRNA च्या वृत्तानुसार, आता भारतीयांनाही इराणभ्रमंतीसाठी व्हिजाची अट शिथील करण्यात आली आहे. इराणमधील पर्यटन वाढीस लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. इराणसह श्रीलंका आणि मलेशिया देशांनीही भारतीय नागरिकांना त्यांच्या देशातील प्रवेशासाठी व्हीसा बंधनकारक असणार नाही. हे दोन्ही देशही भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारताचा इराणसोबत यापूर्वीच करारानुसार व्हीसामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, भारतीय राजकीय नेत्यांना इराणमध्ये राहण्यासाठी व्हिसामध्ये सवलत दिली जाते. मात्र, पहिल्यांदाच एका इस्लामिक देशाने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना व्हीसा सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारतीय नागरिकांना पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 

काय म्हणाले विदेशमंत्री

इराणचे पर्यटनमंत्री एजातुल्ला जर्गहामी यांनी बुधवारी वृत्तसंस्था आईआरएनएशी बोलताना म्हटले की, अधिकााधिक पर्यटनाच्या उद्देशाने इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, पश्चिमी भागात इराणच्याविरुद्ध दिसणाऱ्या इराणोफोबियांविरुद्ध लढा देणं हा आहे, असे जर्गहामी यांनी म्हटलं. 

दरम्यान, इराण आणि भारत देशात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. येथील चाबहार बंदर प्रोजेक्टमध्येही भारताची प्रमुख भागिदारी राहिली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण अफ्रीकेतील जोहान्सबर्गमध्ये आयोजित BRICS शिखर सम्मेलनादरम्यान इराणही या परिषदेत सहभागी झाला आहे. भारत हा ब्रिक्सचा महत्त्वाचा सदस्य आहे. तर, इराण १ जानेवारी २०२४ पासून अधिकृतपणे ब्रिक्सचा सदस्य असणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतIranइराणVisaव्हिसाtourismपर्यटन